शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगलीला चांदोलीचे पाणी देण्यास तीव्र विरोध, श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:21 IST

स्वत:ची कृष्णा नदी प्रदूषित करून चांदोलीवर डोळा कशासाठी?

कोकरुड : चांदोली धरणातूनसांगली शहराला थेट पाणी देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. आमच्या हक्काचे पाणी शिराळ्यासह तालुक्यातील सर्व गावे आणि वाड्या-वस्त्यांना प्रथम मिळाले पाहिजे. अन्यथा श्रमिक मुक्ती दल आणि पाणी वाटप संघर्ष समिती तीव्र लढा उभारेल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य वसंत पाटील यांनी दिला. ते पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे पत्रकार बैठकीत बोलत होते.पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या, गुढे पाचगणी पठार, उत्तर भाग, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांतील वाड्या-वस्त्या शेतीच्या पाण्यापासून आजही वंचित आहेत. धरण परिसरातील या गावांना पाणी देण्याचे नियोजन अजूनही झालेले नाही.चांदोलीपासून रिळेपर्यंतच्या अनेक योजना मंजुरीनंतरही खितपत पडल्या आहेत. शासनाने अद्याप निधी दिलेला नाही. वारणा धरणामध्ये १९९१ पासून पाणी अडवण्यात येत आहे. याला ३२ वर्षे झाली तरी संपूर्ण शिराळा तालुका अद्याप ओलिताखाली आलेला नाही, अशी स्थिती असताना थेट सांगली शहराला चांदोली धरणाचे पाणी नेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला आमचा कडाडून विरोध आहे.

ते म्हणाले, शिराळा तालुक्यातील जनता शेतीला पाणी नसल्याने हमालीसाठी मुंबईला जात आहेत. त्यांच्या शेतीला पाणी मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. मुंबईचा लोंढा थांबणार नाही. यासाठीच वारणेच्या पाण्याचा अट्टाहास आम्ही धरला आहे. मे २०२३ रोजी खराळे (ता. शिराळा) येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणी परिषदेत पाण्याचा निर्धार झाला आहे. वंचित गावे ओलिताखाली आणून मुंबईचा लोंढा थांबविण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी या महिन्यात पुन्हा मेळावा होणार आहे.

कृष्णा प्रदूषित करुन चांदोलीवर डोळा कृष्णेचे पाणी दूषित होण्यामागील कारणे शोधून उपाययोजना राबवायला हव्यात. त्यासाठी सांगलीकरांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी निधी खर्च केला पाहिजे. तसे न करता चांदोलीच्या शुद्ध पाण्यावर डोळा ठेवला जात आहे. स्वत:ची नदी प्रदूषित करून चांदोलीच्या पाण्यासाठी रेटा कशासाठी? असा सवाल शिराळा तालुक्यातील शेतकरी करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी