शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

डफळापुरात पाण्यासाठी रास्ता रोको --: ‘म्हैसाळ’साठी शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:33 IST

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या देवनाळ कालव्यातून मिरवाड (ता. जत) तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी डफळापूर येथे डफळापूर व मिरवाडच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत

ठळक मुद्देजनावरांसह उतरले रस्त्यावर; वाहतूक कोंडी, पैसे भरूनही पाणी नसल्याने संताप

डफळापूर : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या देवनाळ कालव्यातून मिरवाड (ता. जत) तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी डफळापूर येथे डफळापूर व मिरवाडच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत जत-सांगली रस्ता दोन तास रोखून धरला. शेतकरी शेळ्या-मेंढ्या, बैलगाड्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकºयांचा उद्रेक होईल म्हणून प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बाचाबाची वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.मिरवाड येथील शेतकºयांंनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या देवनाळ कालव्यातून पाणी मिळावे म्हणून फेब्रुवारीत योजनेकडे पाच लाख रुपये भरले होते, पण पाणी मिळाले नाही. याच्या निंषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

रास्ता रोकोसाठी सकाळी साडेदहा वाजता शेतकरी बसस्थानक परिसरात जमू लागले. डफळापूर व मिरवाड येथील शेतकºयांनी प्रथम डफळापूर गावातून मोर्चा काढला. हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सचिव दिगंबर कांबळे, शेतकरी संघटना कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष हणमंत कांबळे, विजय चव्हाण, अशोक सवदे, सिध्दू गावडे, संजय भोसले, आण्णाप्पा चव्हाण, अतुल शिंदे, गौस मकानदार, अंबादास कुंभार सहभागी झाले होते.

हा मोर्चा बाजारपेठेतून मुख्य चौकात आला. जत-सांगली रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. शेकडो शेतकरी रस्त्यावर बसले. यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी देवनाळ कालव्याचे कनिष्ठ अभियंता सी. एल. मिरजकर आंदोलनस्थळी आले. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने शेतकºयांनी त्यांना जाब विचारत घेराव घातला. महेश खराडे व मिरजकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.दरम्यान, आंदोलकांनी अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. कनिष्ठ अभियंता मिरजकर यांनी मिरवाड तलावात येत्या १२ तारखेला पाणी सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनाला पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, जिरग्याळचे सरपंच दीपक लंगोटे, विक्रम ढोणे, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सागर चव्हाण, कुडणूरचे माजी सरपंच अज्ञान पांढरे, मराठा स्वराज संघ जिल्हा अध्यक्ष सुभाष गायकवाड, नंदू कट्टीकर, मनोहर भोसले, दत्त पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब माळी आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.सांगलीत आज बैठकदेवनाळ कालव्यातून जोपर्यंत मिरवाड तलावात पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत पुढे बिळूरला आम्ही पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार शेतकºयांनी केला.मिरवाड तलावात पाणी सोडण्याबाबत शुक्रवार दि. ७ रोजी वारणाली, सांगली येथे बैठकीसाठी येथील शेतकºयांना बोलाविण्यात आले आहे.आंदोलन तीव्र होत असताना, आलेल्या दोन रुग्णवाहिकांना शेतकºयांनी मार्ग मोकळा करून दिला.दुष्काळप्रश्नी १२ जूननंतर तीव्र आंदोलनडफळापूर येथे आंदोलनात शेकडो शेतकरी शेळ्या-मेंढ्या, बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते. बारा तारखेपर्यंत मिरवाड तलावात पाणी न सोडल्यास १२ जून रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला.

डफळापूर (ता. जत) येथे शेतकऱ्यांनी मिरवाडी तलावात ‘म्हैसाळ’चे पाणी मिळावे, या मागणीसाठी जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगलीStrikeसंप