शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला हवा सांगलीसह किर्लोस्करवाडीमध्ये थांबा; तिकीट विक्रीवर गाडीचे भवितव्य अवलंबून 

By अविनाश कोळी | Updated: November 4, 2023 14:13 IST

अविनाश कोळी सांगली : कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असली तरी या आधुनिक ...

अविनाश कोळीसांगली : कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असली तरी या आधुनिक गाडीचे भवितव्य तिकीट विक्रीवर अवलंबून आहे. कोल्हापूर, मिरज, साताऱ्यासह सांगली, किर्लोस्करवाडीलाही थांबा मिळाल्यास किमान ८० टक्क्यांवर तिकीट विक्री होऊ शकेल, अन्यथा अल्प काळात कमी तिकीट बुकिंगचे कारण देत ही गाडी बंद होऊ शकते, अशी भीती प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.कोल्हापूर-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सांगली रेल्वे स्टेशनवर ३२ ते ४० टक्के दैनंदिन एसी तिकिटे सांगली स्टेशनवरून बुक होतात. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सांगलीचा थांबा द्यावाच लागेल.वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून सुमारे तीनशे ते साडेतीनशे तिकिटे बुक होतील, असा विश्वास रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपला आहे. किर्लोस्करवाडी उद्योग समूहाचे वरिष्ठ अधिकारी रोज मुंबई, पुणे ते किर्लोस्करवाडी मार्गावर बस व कारने प्रवास करतात. हे लोक वंदे भारत रेल्वेने येऊ लागतील. तसेच, मुंबईतील बडे उद्योजकही मुंबई ते किर्लोस्करवाडी हा प्रवास ‘वंदे भारत’ने करतील. नवीन सुरू होणाऱ्या भोपाळ-बंगळुरू या देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटना, सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय व डॉक्टरांच्या संघटना तसेच अन्य संघटना प्रयत्नशील आहेत.

सर्वाधिक एसी तिकीट विक्री सांगलीतसध्याच्या कोल्हापूर-मुंबई मार्गावरील गाड्यांमध्ये महागड्या एसी फर्स्ट क्लास व एसी टू व एसी थ्री टीयरची कोल्हापूर पाठोपाठ सर्वाधिक तिकिटे सांगली स्थानकावरून बुक होतात.

पावसाळ्यात व आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी कोल्हापूर, सांगली व मिरज या तीन मुख्य रेल्वेस्थानकावरून कमी प्रवासी मिळतात, त्या दिवशी किर्लोस्कर कारखाना, हिंदुस्थान पेट्रोलियम सुरू असल्यामुळे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून जास्त प्रवासी मिळतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. येथे एक्झिक्युटिव्ह क्लासच्या महाग तिकिटांची विक्रमी विक्री होईल. - डाॅ. चंद्रशेखर माने, रेल्वे अभ्यासक, पलूस तालुका

बऱ्याचदा नव्या गाड्या सुरू झाल्या व अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर त्या बंद केल्या जातात. वंदे भारत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना ती कमी तिकीट विक्रीच्या कारणास्तव बंद पडू नये, याची व्यवस्था अगोदरच करावी लागेल. त्यामुळे वंदे भारत गाडीला ८०-९० टक्के तिकीट विक्री होऊन ती चालू राहणेसाठी कोल्हापूर, मिरजेसह सांगली व किर्लोस्करवाडी हे दोन थांबे असणे महत्त्वाचे आहेत. - उमेश शाह, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

टॅग्स :SangliसांगलीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस