शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sangli: तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, २८ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:47 IST

..अन्यथा मोठा अडथळा झाला असता

सांगली : तांदूळवाडी (ता.वाळवा) येथे सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता पुलावरून एसटी बस वीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात चालकासह २८ प्रवासी जखमी झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.गंभीर जखमींमध्ये शिवाजी साहेबराव माने (वय ७५, रा.पुसेसावळी, ता.खटाव जि.सातारा), दवैस मुसा चाफेकर (२४, रा.पाटण, ता.पाटण, जि.सातारा), प्रकाश सर्जेराव शिंदे (३८, रा.रिसवडे, ता.कराड, जि.सातारा), अराकत मुनीवर (वय २८, रा.कोल्हापूर) यांचा समावेश आहे. एसटी चालक वाय.डी. मोकर, वाहक माधुरी खरात, प्रकाश हनुमंत दौडमणी (वय ४०, रा.कराड, जि.सातारा), राजश्री प्रकाश दोडमणी (वय ३७, रा.कराड), सविता रवींद्र शिंदे (वय ४६, रा.कडेगाव, जि. सांगली), मनिषा शंकर शिंदे (वय ४५, रा कराड), श्रेया शंकर शिंदे (वय १८ रा. कराड), शिवाजी महादेव दुडे (वय ८३, रा.गोवारी, जि.सातारा), सुमन यादव (वय ५९, रा.औंध, ता.खटाव, जि.सातारा), राहुल तुकाराम यादव (वय ३८, रा.औंध, ता.खटाव), प्रवीण तुकाराम यादव (वय ४०, रा.औंध गोटेवाडी), सोनाली प्रवीण यादव (वय ३२, रा.औंध गोटेवाडी), शोभा तुकाराम यादव (वय ६३, रा.औंध गोटेवाडी) हे किरकोळ जखमी आहेत. या अपघाताची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील दहीवडी येथून एसटी बस (क्र.एमएच ३४, बीटी ४२०३) जोतिबाकडे निघाली होती. सोमवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदूळवाडी येथील गुरव पुलाजवळ येताच, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे तोडून गाडी वीस फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली. यात २८ प्रवासी जखमी झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, कुरळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक सुनील माने, कासेगाव ठाण्याचे हरिश्चंद्र गावडे आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून मदतकार्यअपघात घडताच जखमींना बाहेर काढण्याचे काम तांदुळवाडी येथील शेतकरी आनंदराव ईश्वरा पाटील, शंकर वळीवडे, विष्णुपंत पाटील, सुरेश शिगांवकर यांनी केले.

जखमींना तातडीची मदतमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, इस्लामपूरचे आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, स्थानकप्रमुख नंदकुमार जाधव, वाहतूक नियंत्रक मिलिंद कुंभार, दीपक यादव, चंद्रशेखर पवार, राहुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व दवाखान्यात जाऊन जखमींना प्रत्येकी एक हजार रुपये तातडीची मदत देण्यात आली.

..तर मोठा अडथळा झाला असताएसटी बस ज्या ओढ्यात पडली, त्या ठिकाणी वारणा नदीवरून आणलेल्या पाण्याच्या योजनांच्या जलवाहिन्या आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजता विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जलवाहिन्यांमधून पाण्याचा स्रोत बंद होता अन्यथा जलवाहिन्या फुटून अपघाताची तीव्रता वाढली असते. जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात