शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

सोयाबीन उत्पादकांची लूट - : इस्लामपुरात बाजार समितीचे सोयीस्कर दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:04 IST

नाफेड’ला विनंती अर्ज करून शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सोयाबीन खरेदी करणाºया व्यापाºयांच्या आर्द्रता तपासणी यंत्राची तपासणी बाजार समितीने केली आहे.

ठळक मुद्देआर्द्रतेचे कारण

इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीनचे पीक अवकाळी पावसाने वाया गेले आहे. जे काही उरलेले सोयाबीन आहे, त्यावर आता व्यापाऱ्यांनी हात मारण्यास सुरुवात केली आहे. आर्द्रतेचे कारण पुढे करत इस्लामपूरसह तालुक्यातील कासेगाव, आष्टा येथील शेतकºयांच्या हातात व्यापारी क्विंटलला केवळ २५00 रुपये टेकवत आहेत.

शासनाने यावर्षी सोयाबीनसाठी ३७१0 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. परंतु अवकाळी पावसाचा फटका काढणीस आलेल्या सोयाबीनला बसला आहे. ते पूर्ण वाळले आहे. परंतु सरींमधून पाणी असल्याने ते काढता येत नाही. काही ठिकाणी ते तडकून शेतात पडू लागले आहे. जे काही हाती लागले, ते शेतकरी बाजारात विक्रीस आणत आहेत. पण आर्द्रतेच्या नावाखाली व्यापारी ३७१0 पैकी शेतकºयांच्या हातात २५00 ते २६00 रुपयेच टेकवत आहेत. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दुर्लक्ष केले आहे.

बाजार समितीचे सचिव विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सोयाबीनच्या १0 आर्द्रतेला शासनाचा ३७१0 हमीभाव आहे. परंतु यावर्षी पावसात पूर्णपणे सोयाबीन भिजल्याने विक्रीस येणारे सोयाबीन हे २२ ते २४ आर्द्रतेचे येत आहे. आम्ही आॅगस्ट महिन्यामध्येच ‘नाफेड’ला विनंती अर्ज करून शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सोयाबीन खरेदी करणाºया व्यापाºयांच्या आर्द्रता तपासणी यंत्राची तपासणी बाजार समितीने केली आहे....अन्यथा आंदोलनव्यापारी संगनमताने शेतकºयांची फसवणूक करत आहेत. शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करुन शेतकºयांना न्याय द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी