शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सोयाबीन उत्पादकांची लूट - : इस्लामपुरात बाजार समितीचे सोयीस्कर दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:04 IST

नाफेड’ला विनंती अर्ज करून शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सोयाबीन खरेदी करणाºया व्यापाºयांच्या आर्द्रता तपासणी यंत्राची तपासणी बाजार समितीने केली आहे.

ठळक मुद्देआर्द्रतेचे कारण

इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीनचे पीक अवकाळी पावसाने वाया गेले आहे. जे काही उरलेले सोयाबीन आहे, त्यावर आता व्यापाऱ्यांनी हात मारण्यास सुरुवात केली आहे. आर्द्रतेचे कारण पुढे करत इस्लामपूरसह तालुक्यातील कासेगाव, आष्टा येथील शेतकºयांच्या हातात व्यापारी क्विंटलला केवळ २५00 रुपये टेकवत आहेत.

शासनाने यावर्षी सोयाबीनसाठी ३७१0 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. परंतु अवकाळी पावसाचा फटका काढणीस आलेल्या सोयाबीनला बसला आहे. ते पूर्ण वाळले आहे. परंतु सरींमधून पाणी असल्याने ते काढता येत नाही. काही ठिकाणी ते तडकून शेतात पडू लागले आहे. जे काही हाती लागले, ते शेतकरी बाजारात विक्रीस आणत आहेत. पण आर्द्रतेच्या नावाखाली व्यापारी ३७१0 पैकी शेतकºयांच्या हातात २५00 ते २६00 रुपयेच टेकवत आहेत. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दुर्लक्ष केले आहे.

बाजार समितीचे सचिव विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सोयाबीनच्या १0 आर्द्रतेला शासनाचा ३७१0 हमीभाव आहे. परंतु यावर्षी पावसात पूर्णपणे सोयाबीन भिजल्याने विक्रीस येणारे सोयाबीन हे २२ ते २४ आर्द्रतेचे येत आहे. आम्ही आॅगस्ट महिन्यामध्येच ‘नाफेड’ला विनंती अर्ज करून शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सोयाबीन खरेदी करणाºया व्यापाºयांच्या आर्द्रता तपासणी यंत्राची तपासणी बाजार समितीने केली आहे....अन्यथा आंदोलनव्यापारी संगनमताने शेतकºयांची फसवणूक करत आहेत. शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करुन शेतकºयांना न्याय द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी