शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:16 IST

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य ...

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आठवल्या जात आहेत. कारण जिल्ह्यातील शेकडो नव्हे तर जवळपास ३० हजार सैनिक देशरक्षणार्थ कर्तव्य बजावत आहेत. त्यातील कित्येक जण सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत.पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक ठार झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. समाज माध्यमातूनही ‘पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना मारा’ अशा ‘पोस्ट’ चा भडीमार सुरू होता. तशातच ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या संरक्षण दलाला प्रत्युत्तर देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे युद्धाचे सावट दिसून येते. जिल्ह्यात सुटीवर आलेल्या अनेक जवानांना माघारी बोलवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले आहेत. त्यांना निरोप देताना कुटुंबीयांना गलबलून आले.सुटीवर आलेले जवान परत गेल्यामुळे तसेच सध्या सीमेवर असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांमध्ये युद्धाबाबतच्या अनामिक भीतीचे सावट आहे. समाज माध्यमावर सैनिक सीमेवर जात असल्याचे भावुक व्हिडीओ पाहून अनेकांना जीव तुटत आहे. सैनिक मात्र देशसेवेसाठी अभिमानाने कर्तव्यावर रूजू होण्यासाठी जाताना दिसत आहेत. युद्धाच्या परिस्थितीत कोणतीही वाईट बातमी कानावर पडू नये अशी प्रार्थना सैनिकांचे कुटुंब मनोमन करत आहेत.स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. आता सैनिकांचा जिल्हा म्हणूनही सांगलीला ओळखले जाते. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार सैनिक देशसेवेसाठी कर्तव्यावर आहेत. त्यापैकी हजारो सैनिक सद्यस्थितीत सीमेवर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे सर्व लक्ष सीमेवरील हालचालीकडे आहे. सैनिकाची पत्नी, आई, वडील, मुले, नातेवाईक काळजीत आहेत. त्यांची हूरहूर, काळजी पाहून नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारील मंडळी त्यांना धीर देताना दिसत आहेत. गदिमांच्या गीतातील ‘वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो, राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो, परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी’ अशीच अनेकांची अवस्था आहे.

पराक्रमी शूरवीरांचा जिल्हाभारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान देशरक्षणार्थ शहीद झाले आहेत. ७० जणांना शौर्यपदक मिळाले. एक महावीर चक्र, एक शौर्य चक्र, ३१ सेना / नौसेना / वायूसेना पदके प्राप्त केली आहेत.

२० हजार माजी सैनिकजिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार ६७५ सैनिक देशाचे रक्षण करून निवृत्त झालेले आहेत. तसेच ६ हजार ९९ सैनिकांच्या विधवा कुटुंबांची जबाबदारी सांभाळत आहेत. तर जवळपास ३० हजार सैनिक कर्तव्यावर असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयातून देण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान