शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:16 IST

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य ...

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आठवल्या जात आहेत. कारण जिल्ह्यातील शेकडो नव्हे तर जवळपास ३० हजार सैनिक देशरक्षणार्थ कर्तव्य बजावत आहेत. त्यातील कित्येक जण सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत.पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक ठार झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. समाज माध्यमातूनही ‘पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना मारा’ अशा ‘पोस्ट’ चा भडीमार सुरू होता. तशातच ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या संरक्षण दलाला प्रत्युत्तर देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे युद्धाचे सावट दिसून येते. जिल्ह्यात सुटीवर आलेल्या अनेक जवानांना माघारी बोलवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले आहेत. त्यांना निरोप देताना कुटुंबीयांना गलबलून आले.सुटीवर आलेले जवान परत गेल्यामुळे तसेच सध्या सीमेवर असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांमध्ये युद्धाबाबतच्या अनामिक भीतीचे सावट आहे. समाज माध्यमावर सैनिक सीमेवर जात असल्याचे भावुक व्हिडीओ पाहून अनेकांना जीव तुटत आहे. सैनिक मात्र देशसेवेसाठी अभिमानाने कर्तव्यावर रूजू होण्यासाठी जाताना दिसत आहेत. युद्धाच्या परिस्थितीत कोणतीही वाईट बातमी कानावर पडू नये अशी प्रार्थना सैनिकांचे कुटुंब मनोमन करत आहेत.स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. आता सैनिकांचा जिल्हा म्हणूनही सांगलीला ओळखले जाते. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार सैनिक देशसेवेसाठी कर्तव्यावर आहेत. त्यापैकी हजारो सैनिक सद्यस्थितीत सीमेवर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे सर्व लक्ष सीमेवरील हालचालीकडे आहे. सैनिकाची पत्नी, आई, वडील, मुले, नातेवाईक काळजीत आहेत. त्यांची हूरहूर, काळजी पाहून नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारील मंडळी त्यांना धीर देताना दिसत आहेत. गदिमांच्या गीतातील ‘वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो, राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो, परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी’ अशीच अनेकांची अवस्था आहे.

पराक्रमी शूरवीरांचा जिल्हाभारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान देशरक्षणार्थ शहीद झाले आहेत. ७० जणांना शौर्यपदक मिळाले. एक महावीर चक्र, एक शौर्य चक्र, ३१ सेना / नौसेना / वायूसेना पदके प्राप्त केली आहेत.

२० हजार माजी सैनिकजिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार ६७५ सैनिक देशाचे रक्षण करून निवृत्त झालेले आहेत. तसेच ६ हजार ९९ सैनिकांच्या विधवा कुटुंबांची जबाबदारी सांभाळत आहेत. तर जवळपास ३० हजार सैनिक कर्तव्यावर असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयातून देण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान