शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 20:15 IST

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला.

सांगली : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्राच्या सीमा भागातील दुष्काळी गावांना पाणी देण्याबाबत लवकरच मंत्रीमंडळात चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगलीतील कार्यक्रमात दिले.

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम. बी. पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. सतेज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. मोहनराव कदम, आ. जयंत असगावकर, आ. आर. व्ही. देशपांडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, आ. प्रकाश हुक्केरी, आ. बसवराज पाटील, मधुकर चव्हाण, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, शैलजाभाभी पाटील आदी उपस्थित होते.

सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच जातीयवादी राजकारण केले. लोकशाही व घटनेविरोधातले हे लोक आता सत्तेवर आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही टिकली तरच सामान्य माणूस सुखात राहील, अन्यथा या देशात लोकशाहीशिवाय जगणे मुश्कील होऊन जाईल.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी कर्नाटकात ज्याठिकाणी रोड शो, सभा घेतल्या तिथे भाजप पराभूत झाला. त्यामुळे मोदींची जादू पूर्णत: संपल्याचे हे द्योतक आहे. कर्नाटकात आजपर्यंत कधीही भाजप जनतेतून निवडून आला नाही. ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून आमदार विकत घेऊन ते सत्तेवर आले आहेत. अनेक बऱ्याच राज्यात हाच फर्म्युला त्यांनी वापरला. त्यामुळे जनतेने त्यांना केव्हाच नाकारले आहे. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेतील भाजपला दूर करावे.

सिद्धरामय्या म्हणाले की, कर्नाटकात गरिबांसाठी मोफत धान्याची योजना आम्ही सुरु केली, मात्र गरिबांना मोफत धान्य मिळू नये म्हणून केंद्रातील मोदी सरकारने भारतीय अन्न महामंडळावर दबाव आणला. आता कर्नाटकातील तांदूळ पुरवठा बंद झाला आहे.

‘आदिपुरुष’च्या मागे भाजपरामायणावरील ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बनविण्यामागे भाजपच आहे. याच चित्रपटात राम, हनुमान या देवतांचा मोठा अवमान करण्यात आला. महापुरुषांचा अवमान करणारे आता देवांचाही अवमान करीत आहेत, अशी टिका नाना पटोले यांनी केली. 

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगलीKarnatakकर्नाटकWaterपाणी