शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 20:15 IST

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला.

सांगली : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्राच्या सीमा भागातील दुष्काळी गावांना पाणी देण्याबाबत लवकरच मंत्रीमंडळात चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगलीतील कार्यक्रमात दिले.

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम. बी. पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. सतेज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. मोहनराव कदम, आ. जयंत असगावकर, आ. आर. व्ही. देशपांडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, आ. प्रकाश हुक्केरी, आ. बसवराज पाटील, मधुकर चव्हाण, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, शैलजाभाभी पाटील आदी उपस्थित होते.

सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच जातीयवादी राजकारण केले. लोकशाही व घटनेविरोधातले हे लोक आता सत्तेवर आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही टिकली तरच सामान्य माणूस सुखात राहील, अन्यथा या देशात लोकशाहीशिवाय जगणे मुश्कील होऊन जाईल.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी कर्नाटकात ज्याठिकाणी रोड शो, सभा घेतल्या तिथे भाजप पराभूत झाला. त्यामुळे मोदींची जादू पूर्णत: संपल्याचे हे द्योतक आहे. कर्नाटकात आजपर्यंत कधीही भाजप जनतेतून निवडून आला नाही. ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून आमदार विकत घेऊन ते सत्तेवर आले आहेत. अनेक बऱ्याच राज्यात हाच फर्म्युला त्यांनी वापरला. त्यामुळे जनतेने त्यांना केव्हाच नाकारले आहे. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेतील भाजपला दूर करावे.

सिद्धरामय्या म्हणाले की, कर्नाटकात गरिबांसाठी मोफत धान्याची योजना आम्ही सुरु केली, मात्र गरिबांना मोफत धान्य मिळू नये म्हणून केंद्रातील मोदी सरकारने भारतीय अन्न महामंडळावर दबाव आणला. आता कर्नाटकातील तांदूळ पुरवठा बंद झाला आहे.

‘आदिपुरुष’च्या मागे भाजपरामायणावरील ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बनविण्यामागे भाजपच आहे. याच चित्रपटात राम, हनुमान या देवतांचा मोठा अवमान करण्यात आला. महापुरुषांचा अवमान करणारे आता देवांचाही अवमान करीत आहेत, अशी टिका नाना पटोले यांनी केली. 

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगलीKarnatakकर्नाटकWaterपाणी