शहरं
Join us  
Trending Stories
1
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
2
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
3
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
4
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
5
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
6
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
7
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
9
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
10
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
11
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
12
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
13
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
14
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
15
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
16
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
17
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
18
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
19
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
20
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Maharashtra ११८४ प्रवासी आनंदी, निघाले आपल्या गावी : मिरजेतून गोरखपूरला श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:17 IST

ओळखपत्र नसल्याने, तसेच तापमान जास्त असल्याने काहीजणांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस बंदोबस्तात सर्वांना रेल्वे बोगीत बसविण्यात आले. नोंदणी केलेल्या कामगारांशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाही, याची खबरदारी रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने घेतली होती.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील अन्य जिल्ह्यातील प्रवाशांना गोरखपूर येथून अन्यत्र पाठविण्याची सोय करणार आहे.

मिरज : उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी रविवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाली. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते कामगारांना रेल्वे तिकिटे व भोजन देण्यात आले. प्रत्येक बोगीत ५२ प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ११८४ प्रवासी या रेल्वेतून रवाना झाले.

सायंकाळपासून परप्रांतीय प्रवाशांना बसमधून रेल्वे स्थानकाकडे आणण्यात आले. एका बसमध्ये पंचवीस प्रवासी, याप्रमाणे दोन बसेसना एका नोडल अधिका-याची नियुक्ती करण्यात आली होती. १६ नोडल अधिका-यांनी ३२ बसेसमधून नोंदणीकृत ११८४ प्रवाशांना रेल्वे स्थानकात आणले. स्थानिक पोलिसांचा रेल्वे स्थानकाबाहेर बंदोबस्त होता. महसूल अधिका-यांनी रेल्वे स्थानकात प्रवेशापूर्वी प्रवाशांच्या ओळखपत्राची तपासणी केली. ओळखपत्र नसल्याने, तसेच तापमान जास्त असल्याने काहीजणांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस बंदोबस्तात सर्वांना रेल्वे बोगीत बसविण्यात आले. नोंदणी केलेल्या कामगारांशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाही, याची खबरदारी रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने घेतली होती.

प्रवाशांना रेल्वे तिकिटासोबत दोन पाण्याच्या बाटल्या व जेवणासह पुढील ३० तासांच्या प्रवासासाठी गूळपोळी, थालीपीठ  देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजित देसाई, पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गील यांच्यासह पोलीस व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. गोरखपूरसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असून, मिरजेतून रविवारी पहिली रेल्वे रवाना झाली. मंगळवारी दुसरी रेल्वे पाठविण्याची तयारी सुरु आहे. थेट गोरखपूरपर्यंत जाणारी रेल्वे वाटेत कोठेही थांबणार नाही किंवा कोणत्याही प्रवाशाला वाटेत उतरू देणार नाही. उत्तर प्रदेशातील अन्य जिल्ह्यातील प्रवाशांना गोरखपूर येथून अन्यत्र पाठविण्याची सोय करणार आहे.

विश्वजित कदम यांचा पुढाकारजिल्ह्यात हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी उत्तर भारतीयांची संख्या मोठी असल्याने गोरखपूरपर्यंत मिरजेतून दोन विशेष रेल्वेंचे प्रशासनातर्फे नियोजन केले आहे. विशेष रेल्वेची प्रत्येकी साडेनऊ लाख रुपये खर्चाची व्यवस्था मंत्री विश्वजित कदम यांनी केल्याने मजुरांना दिलासा मिळाला. मंत्री विश्वजित कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम यांनी प्रवाशांची विचारपूस केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार परप्रांतीयांच्या रेल्वे तिकिटाची व भोजनाची व्यवस्था केल्याचे कदम यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस