शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

शेळी-मेंढी छावण्यांची घोषणा ठरणार मृगजळ -जत तालुक्यातील परिस्थिती :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:02 AM

शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला

ठळक मुद्देपशुपालकांना करावी लागते तारेवरची कसरत

गजानन पाटील ।संख : शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.

जत तालुक्यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या-मेंढ्यांचे पालन केले जाते. तालुक्यामध्ये शेळ्यांची संख्या १ लाख ३० हजार ३९५ आहे. शेळीबरोबर मेंढीपालन हा व्यवसाय केला जातो. तालुक्यात मेंढ्यांची संख्या ७७ हजार ९७६ आहे. मात्र चाऱ्याअभावी उपासमारीची वेळ आली आहे. मान्सून व अवकाळी पाऊस न झाल्यामुळे भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रानातील खुरट्या गवताची उगवण झाली नाही. चाºयासाठी जनावरांना रानोमाळ वणवण भटकंती करावी लागत आहे.

पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर दुष्काळी दौºयावर आले असताना, पशुपालकांनी शेळया-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुष्काळग्रस्त आठ जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने पावसाच्या तोंडावर घेतला. पशुसंवर्धन विभागाने पशुगणनेची माहिती वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती, मात्र फक्त मोठ्या जनावरांसाठी छावण्या सुरू झाल्या. लहान जनावरांचा विचार झाला नाही.

शेळ्या-मेंढ्या छावणीचा मुद्दा सर्वप्रथम २०१० मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी सरकारने प्रतिजनावरावर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम फारच तोकडी असल्याने त्यावेळी लहान जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या नाहीत. २०१२ व २०१५ मध्येही मोठ्या जनावरांच्या छावण्या सुरु झाल्या, मात्र त्यावेळेसही शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्यांची चर्चा झाली नाही. आता तब्बल नऊ वर्षानंतर त्यांच्या छावण्यांना मंजुरी दिली आहे. प्रति जनावरावर मिळणारे अनुदान वाढवून पंचवीस रुपये केले. परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर आठ ते दहा-पंधरा दिवसात चारा उपलब्ध होईल. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असला तरी तो फसवा आहे, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.छावणीचालकांना : न परवडणाºया अटीशेळ्या-मेंढ्यांसाठी प्रतिदिन २५ रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले. ओला चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य मुरघास हे त्यातच देणे छावणी चालकांना परवडणारे नाही. ऊस व उसाचे वाडे हिरवा चारा म्हणून देऊ नये, अशी अट सरकारने छावणीचालकांना घातली आहे. हिरवा चारा म्हणून देण्यासाठी मुरघास हा एकच पर्याय आहे. तो सहजासहजी मिळणे कठीण आहे.

प्रतिकूल स्थितीचाºयाचा अभाव, वाढती उष्णता, पाणी समस्या यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या गर्भपाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे गर्भधारणा होत नसल्याचे चित्र आहे. 

पावसाला सुरुवात झाल्यास पंधरा दिवसांत लहान जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याची स्थिती आहे. शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचे जाहीर केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा निर्णय घेतला. जनावरे जगविणे अवघड झाले आहे. चारा छावणीचा निर्णय फक्त नादी लावण्यासाठी आहे.- विठ्ठल कटरे, मेंढपाळ, तिल्याळ

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना