शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

कृष्णा, वारणा नदीत मिसळते १०४ गावांचे सांडपाणी; व्यवस्थापनासाठी शासनाकडून १३ कोटींचा निधी मंजूर

By अशोक डोंबाळे | Updated: March 27, 2023 17:11 IST

पाच गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध होत नसल्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प रखडला

सांगली : जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना हेच प्रदूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. वाळवा, शिराळा, मिरज आणि पलूस तालुक्यांतील १०४ गावांमधील सांडपाणी थेट कृष्णा आणि वारणा नदीत सोडले जात आहे. या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाने १३ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून काही कामे सुरू आहेत.कृष्णा नदीचासांगली जिल्ह्यात प्रवेश झाल्यापासून ६९ गावांचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. यात वाळवा तालुक्यातील ३२, मिरज तालुक्यातील १४ आणि पलूस तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे. वारणा नदीचे पाणी दूषित करण्यातही वाळवा तालुक्यातील ९, शिराळा तालुक्यातील २१, मिरज तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस कृष्णा आणि वारणा नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिका, आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिकांचाही कृष्णा नदीचे पाणी दूषित करण्यात मोठा वाटा आहे. सर्वाधिक दूषित पाणी हे साखर कारखान्यांच्या मळीमिश्रित पाण्यामुळे होत आहे. या कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळेच कृष्णा आणि वारणा नदीत मासेही मृत पावले होते. यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न विधानसभेत पोहोचला.केंद्र, राज्य शासनाकडून नदीकाठावरील १०४ गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी १३ कोटी ११ लाख २७ हजार २५८ रुपयांचा निधी मंजूर आहे. पण, पलूस तालुक्यातील पाच गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा मिळत नसल्याचे प्रशासनाने सांगितले. ७५ गावांमधील सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांना जिल्हा परिषद प्रशासनाने मंजुरीही दिली आहे. यापैकी ४८ गावांमध्ये कामे सुरू असून, १५ गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत. अन्य १२ गावांमधील कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

तालुका - गावेवाळवा - ४१शिराळा - २१मिरज - १९पलूस - २३एकूण - १०४

पाच गावांमध्ये जागाच मिळेनापलूस तालुक्यातील भिलवडी, वसगडे, माळवाडी, घोगाव आणि पुणदी या पाच गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाकडून निधी मंजूर आहे. पण, ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध होत नसल्यामुळे येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प होऊ शकला नाही. या गावांचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याचे सांगण्यात आले.

सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदीत सोडणे हा गुन्हा आहे. यामुळे प्रत्येक गावाने सांडपाणी व्यवस्थापन करूनच नदीत पाणी सोडले पाहिजे. त्यासाठी शासन निधी देण्यास तयार आहे. - जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीpollutionप्रदूषण