शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे कारागृह झाले ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: August 30, 2015 22:33 IST

क्षमता ओलांडली : २२0 क्षमता असताना ३५१ कैदी

सचिन लाड -- सांगली  --जिल्हा मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे. २२० क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या ३५१ कैदी आहेत. यामध्ये ३४० पुरुष व ११ महिलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्वांवर नजर ठेवताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, मारामारी, दरोडा, वाटमारी, घरफोडी, जातीवाचक शिवीगाळ, बेकायदा हत्यार बाळगणे, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासह अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी कारागृहात आहेत. शिक्षा लागल्यानंतर या कैद्यांना पुढे कोल्हापुरात कळंबा किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात हलविले जाते. एखाद्या गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक झाली की, त्याची पोलीस कोठडी घेतली जाते. तपास संपल्यानंतर या आरोपींची न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) रवानगी होती. हा आरोपी जामिनासाठी अर्ज करतो. पण न्यायालयाने जामीन फेटाळला तर त्याला कारागृहातच ठेवले जाते. प्रत्येक पंधरा दिवसाला त्याला न्यायालयात उभे करून कारागृहात ठेवण्याची मुदत वाढवून घेतली जाते. २२० कैदी ठेवण्याची क्षमता असलेले हे कारागृह आहे. यामध्ये २१२ पुरुष व आठ महिलांची क्षमता आहे, पण गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने कारागृहातील कच्चा कैद्यांची संख्या वाढत गेली.दररोज दोन-चार कैदी जामिनावर बाहेर येत असले तरी, तेवढेच विविध गुन्ह्यात कारागृहात जात आहेत. त्यामुळे कैद्यांच्या संख्येचा हा आकडा कधी वाढतो, तर कधी स्थिर राहतो. कैद्यांची दिवसेंदिवस वाढत असणारी संख्या, कारागृहाच्या सभोवताली वाढलेली लोकवस्ती पाहिली, तर सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. ३५१ कैद्यांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेक कैद्यांना दररोज न्यायालयातील सुनावणीला हजर करावे लागते. हे काम पोलिसांचे असले तरी, कर्मचाऱ्यांना या कैद्यांना आतून सुरक्षित आणावे लागते.खुनाच्या गुन्ह्यात अनेक संशयितांचे खटले न्यायालयीन पटलावर आलेले नाहीत. चार वर्षापूवी झालेल्या खून प्रकरणांची प्रक्रियाही रेंगाळली आहे. त्यामुळे यातील संशयित कारागृहातच अडकले असल्याचे चित्र आहे. कैद्यांची वाढती संख्या, कारागृहाची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय व्हावी, यासाठी सांगलीचे कारागृह हलविण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा घेतली जाणार आहे. दीडशे एकर असलेली ही जागा सध्या एमआयडीसीच्या ताब्यात आहे. ती कारागृहासाठी मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार प्रयत्न करीत आहेत.