शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सांगली : इस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळ, विधानसभा मतदारसंघातील हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 5:52 PM

इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.

ठळक मुद्देइस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळविधानसभा मतदारसंघातील हालचालीभाजपची उसनवारीच्या तव्यावर पोळी

अशोक पाटील

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मंत्री खोत यांनी राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील, वैभव शिंदे यांना भाजपमध्ये आणून आपली पोळी भाजून घेतली आहे. तर खा. शेट्टी यांनी अलीकडील काही दिवसांत राष्ट्रवादीशी सलगी केली आहे. यामुळे सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील उसाला दर देण्यासाठी शेट्टी व खोत यांनी साखर सम्राटांविरोधात आवाज उठविला होता. साखर सम्राटांचे नेतृत्व करणारे तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात शेट्टी आणि खोत यांनी रान पेटविले होते. लोकसभा निवडणुकीत दोघेही महाआघाडीच्या माध्यमातून भाजपच्या वळचणीला जाऊन बसले.

भाजपला चांगले यशही मिळाले आणि सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यासमोर मंत्रीपद दिसू लागले. ते मिळविण्यासाठी प्रसंगी खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल दिली. त्यासाठी फडणवीस यांच्याकडे वाऱ्याही वाढविल्या. अखेर त्यांना कृषी राज्यमंत्री पद मिळाले.मंत्रिपदामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे वाटत असतानाच खोत यांनी भाजपची पाठराखण करीत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच रेंगाळत ठेवले. तसेच पुलतांबा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही त्यांनी कसलीही मध्यस्थी केली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष बळावला. तेव्हापासून शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावत गेली.इस्लामपूर मतदारसंघावर एकमुखी नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीतीलच दोन प्यादी फोडून खोत यांनी स्वत:ची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष (पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे) निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.

इस्लामपूर मतदारसंघात पाचवेळा मुख्यमंत्र्यांनी येऊन शेतकऱ्यांच्या चळवळीबरोबर राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्याचेच काम केले आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर गटांतील कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत इस्लामपूर मतदारसंघात राजकीय समीकरणे रोजच बदलत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीElectionनिवडणूक