शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

LokSabha2024: सांगलीचा ‘वाघ’ कोण? इस्लामपूर, तासगाव की कडेगावचा? उद्या फैसला

By हणमंत पाटील | Updated: June 3, 2024 18:00 IST

हणमंत पाटील सांगली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे ‘वाघ’ आहोत, असे ...

हणमंत पाटीलसांगली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे ‘वाघ’ आहोत, असे विश्वजित कदम यांनी जाहीर व्यासपीठावर ठणकावून सांगितले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या (दि.४) निकालावरून जिल्ह्याला वारणेचा, तासगावचा की कडेगावचा वाघ मिळतो, ते ठरणार आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची राज्यभर उत्सुकता आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तिकीट मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा लागला. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई, दिल्ली व नागपूर दौरे केले. तरीही काँग्रेसजनांच्या पदरी निराशा आली.महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेनेने सांगलीचे तिकीट दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी हट्टाने आणले. मात्र, नाराज झालेल्या काँग्रेसच्या सांगलीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारावर पहिल्या टप्प्यात बहिष्कार टाकला. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर टीकाटिप्पणी केली. त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या छुप्या पाठिंब्यावर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी लढविली.नाराज असूनही महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून विश्वजित कदम यांंनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात व्यासपीठावर उपस्थित दाखविली. त्यावेळी उद्धवजी तुम्ही राज्याचे वाघ आहात, पण जिल्ह्याचे वाघ आम्ही आहोत, असे कदम यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. त्यानंतर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या विधानाला प्रचारात फोडणी दिली. वाघ झुडपात लपून हल्ला करीत नाही, तर समोरून येतो. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, तर तुम्हाला आम्ही खरेच वाघ समजू, अशी टिप्पणी राऊत यांनी केली. त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक म्हणजे सांगली जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई मानली जात आहे.

जिल्ह्याच्या नेतृत्वाचा संघर्ष..

१९८०च्या दशकात वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना राज्यातील सत्तेची सूत्रे सांगलीतून हलविली जात होती. १९९०च्या दशकानंतर ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील व मदन पाटील या चार नेत्यांचा दबदबा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात होता. दरम्यान, २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत जिल्ह्यातील आबा, भाऊ व साहेब अशा तिन्ही दिग्गज नेत्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील यांनी भरून काढली. त्यामुळे सांगलीचे नेतृत्व वारणेच्या वाघाकडे आहे, असे सांगलीत म्हटले जात. दरम्यान, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि २०१९ च्या निवडणुकीनंतर विश्वजित कदम यांचे नेतृत्व पुढे आले. तेही महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले अन् पुन्हा जिल्ह्याच्या नेतृत्वाचा संघर्ष सुरू झाला.अन् नेत्यांच्या तडजोडीला तडे..दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांशी तडजोड करीत संजयकाका पाटील यांनी खासदार म्हणून सलग १० वर्षे जिल्ह्यात आर. आर. पाटील यांच्यानंतर पुन्हा एकदा तासगावचे वर्चस्व कायम ठेवले. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र या तिन्ही नेत्यांच्या तडजोडीला तडे गेले. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागील विश्वजित कदम यांची पडद्यामागील भूमिका, उद्धवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी वाजविलेली तुतारी आणि संजयकाका यांचा भाजपात ‘एकला चलोरे’चा बाणा, या वेगवेगळ्या भूमिकांमुळे तिन्ही नेते आमने-सामने आले आहेत अन् लोकसभेच्या निकालानंतर वारणेचा, तासगावचा की कडेगावचा नेता जिल्ह्याचा वाघ होणार हे ठरणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vishwajeet Kadamविश्वजीत कदमJayant Patilजयंत पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटील