शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

LokSabha2024: सांगलीचा ‘वाघ’ कोण? इस्लामपूर, तासगाव की कडेगावचा? उद्या फैसला

By हणमंत पाटील | Updated: June 3, 2024 18:00 IST

हणमंत पाटील सांगली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे ‘वाघ’ आहोत, असे ...

हणमंत पाटीलसांगली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे ‘वाघ’ आहोत, असे विश्वजित कदम यांनी जाहीर व्यासपीठावर ठणकावून सांगितले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या (दि.४) निकालावरून जिल्ह्याला वारणेचा, तासगावचा की कडेगावचा वाघ मिळतो, ते ठरणार आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची राज्यभर उत्सुकता आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तिकीट मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा लागला. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई, दिल्ली व नागपूर दौरे केले. तरीही काँग्रेसजनांच्या पदरी निराशा आली.महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेनेने सांगलीचे तिकीट दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी हट्टाने आणले. मात्र, नाराज झालेल्या काँग्रेसच्या सांगलीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारावर पहिल्या टप्प्यात बहिष्कार टाकला. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर टीकाटिप्पणी केली. त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या छुप्या पाठिंब्यावर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी लढविली.नाराज असूनही महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून विश्वजित कदम यांंनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात व्यासपीठावर उपस्थित दाखविली. त्यावेळी उद्धवजी तुम्ही राज्याचे वाघ आहात, पण जिल्ह्याचे वाघ आम्ही आहोत, असे कदम यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. त्यानंतर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या विधानाला प्रचारात फोडणी दिली. वाघ झुडपात लपून हल्ला करीत नाही, तर समोरून येतो. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, तर तुम्हाला आम्ही खरेच वाघ समजू, अशी टिप्पणी राऊत यांनी केली. त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक म्हणजे सांगली जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई मानली जात आहे.

जिल्ह्याच्या नेतृत्वाचा संघर्ष..

१९८०च्या दशकात वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना राज्यातील सत्तेची सूत्रे सांगलीतून हलविली जात होती. १९९०च्या दशकानंतर ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील व मदन पाटील या चार नेत्यांचा दबदबा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात होता. दरम्यान, २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत जिल्ह्यातील आबा, भाऊ व साहेब अशा तिन्ही दिग्गज नेत्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील यांनी भरून काढली. त्यामुळे सांगलीचे नेतृत्व वारणेच्या वाघाकडे आहे, असे सांगलीत म्हटले जात. दरम्यान, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि २०१९ च्या निवडणुकीनंतर विश्वजित कदम यांचे नेतृत्व पुढे आले. तेही महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले अन् पुन्हा जिल्ह्याच्या नेतृत्वाचा संघर्ष सुरू झाला.अन् नेत्यांच्या तडजोडीला तडे..दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांशी तडजोड करीत संजयकाका पाटील यांनी खासदार म्हणून सलग १० वर्षे जिल्ह्यात आर. आर. पाटील यांच्यानंतर पुन्हा एकदा तासगावचे वर्चस्व कायम ठेवले. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र या तिन्ही नेत्यांच्या तडजोडीला तडे गेले. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागील विश्वजित कदम यांची पडद्यामागील भूमिका, उद्धवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी वाजविलेली तुतारी आणि संजयकाका यांचा भाजपात ‘एकला चलोरे’चा बाणा, या वेगवेगळ्या भूमिकांमुळे तिन्ही नेते आमने-सामने आले आहेत अन् लोकसभेच्या निकालानंतर वारणेचा, तासगावचा की कडेगावचा नेता जिल्ह्याचा वाघ होणार हे ठरणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vishwajeet Kadamविश्वजीत कदमJayant Patilजयंत पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटील