शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

सांगली : जिल्ह्यात १८२ कोटींची कर्जमाफी, लाभार्थी ८७ हजारावर, तालुका उपनिबंधकांचे उर्वरीत प्रक्रियेसाठी पुण्यात प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 3:22 PM

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांना १८२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यापुढे ग्रीन यादी प्रसिद्ध होणार नसून तालुकास्तरीय कमिटीकडून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात १८२ कोटींची कर्जमाफीछत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत लाभार्थी ८७ हजारावर तालुका उपनिबंधकांचे उर्वरीत प्रक्रियेसाठी पुण्यात प्रशिक्षण

सांगली : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांना १८२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यापुढे ग्रीन यादी प्रसिद्ध होणार नसून तालुकास्तरीय कमिटीकडून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी अद्याप ७५ हजार शेतकरी प्रतिक्षेत आहेत. कर्जमाफीसाठी तालुका सहकार उपनिबंधक (ए. आर.) यांच्या अध्यक्षतेखाली् समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्यासाठी पुढील आठवड्यात एक दिवशीय प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे.कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १.८३ लाख शेतकरी कुटुंबानी अर्ज आॅनलाईन भरले होते. जिल्ह्यातील कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाच्या चार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यापुढे यादी प्रसिद्ध होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतू पात्र-अपात्रतेबाबतची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे.

ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, तसेच ज्यांनी अर्ज भरलेला नाही, मात्र कर्जमाफीसाठी पात्र आहेत, त्यांनाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज केला, पण त्यांची नावे आलेली नाहीत, त्यांच्या अजार्ची पडताळणी तालुकास्तरीय समितीकडून केली जाईल. त्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.एक लाख शेतकरी चारही याद्यांमध्ये कर्जमाफीस पात्र होऊ शकलेले नाहीत. त्यांना कर्जमाफी देण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली आहे. कर्जमाफीसाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी तालुका सहकारी उपनिबंधक आहेत. याबाबत आदेश तीन दिवसापूर्वी काढण्यात आला. यापुढे सरकारकडून कर्जमाफीची यादी जाहीर केली जाणार नाही.राज्य शासनाने आजअखेर केलेल्या कर्जमाफीच्या चार याद्यांतून ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. ती माफी देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभाग, जिल्हा बँका, सहकार विभागाला नाकी नऊ आले होते.

गेली चार महिने माफीचा खेळ सुरू होता. आता उर्वरित ७५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठा विषय तालुकास्तरीय समितीच्या कोर्टात टाकला आहे.त्या समितीकडून खऱ्या अथार्ने शेतकऱ्यांना केव्हा, किती व कसा न्याय मिळेल हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.सर्वाधिक काम तालुकास्तरीय कमिटीला...ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले मात्र ज्यांना माफी मिळालेली नाही. त्या आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत तालुका समितीने अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. राज्य सरकार, जिल्हा सहकार उपनिबंधक, जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीपेक्षा जादा काम तालुकास्तरीय समितीला करावे लागणार आहे हे निश्चित आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार