शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:31 IST

मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी धरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका नाही, हे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या भागाला अलमट्टी, हिप्परगी धरणामुळेच महापुराचा धोका आहे, असा दावाही महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत सोमवारी बैठक झाली. या बैठकीस महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, संजय कोरे, सतीश रांजणे, चंद्रकांत पाटील, सचिन सागरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सर्जेराव पाटील, दिवाण म्हणाले की, डॉ. हेमंत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली २००६ मध्ये आयआयटी मुंबईचे दोन प्राध्यापक आचरे आणि साठे यांच्यासोबत समिती गठित केली होती. या तिघांच्या समितीचा अहवाल प्रशासनास सादर केला आहे. या अहवालात अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याच्या फुगवट्यामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे; परंतु तो अहवाल गायब आहे. तो पाठपुरावा करूनही मिळत नाही.

२००६ मध्ये इंजिनिअर्स व आर्किटेक्टच्या सभागृहातील कार्यक्रमात अलमट्टीचा फुगवटाही महापुरास कारणीभूत आहे, असे डॉ. धुमाळ म्हणाले होते. मग आता असे बोलून ते भ्रम निर्माण का करत आहेत? मुळात धुमाळ यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून बोलण्याची गरज होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे पूरग्रस्तांमध्ये नाराजी असल्यामुळे आम्ही त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करीत आहोत. अधिकाऱ्यांनी यापुढे अभ्यास करूनच मत व्यक्त करावे.जनतेची दिशाभूल करू नयेमाजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील पुरात कर्नाटक सरकार आणि अलमट्टीतील अधिकाऱ्यांना विनंती करून अलमट्टीतून विसर्ग वाढविला होता. त्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा कमी होऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा महापुराचा धोका टळला होता, असे दोन्ही मंत्र्यांनी जाहीर केले होते. पुरास अलमट्टीच जबाबदार असल्याचे त्यांचेही ते म्हणणे होते. असे असताना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे विधान करून जनतेची दिशाभूल करू नये, असेही पाटील, दिवाण म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfloodपूरDamधरण