शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:31 IST

मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी धरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका नाही, हे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या भागाला अलमट्टी, हिप्परगी धरणामुळेच महापुराचा धोका आहे, असा दावाही महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत सोमवारी बैठक झाली. या बैठकीस महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, संजय कोरे, सतीश रांजणे, चंद्रकांत पाटील, सचिन सागरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सर्जेराव पाटील, दिवाण म्हणाले की, डॉ. हेमंत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली २००६ मध्ये आयआयटी मुंबईचे दोन प्राध्यापक आचरे आणि साठे यांच्यासोबत समिती गठित केली होती. या तिघांच्या समितीचा अहवाल प्रशासनास सादर केला आहे. या अहवालात अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याच्या फुगवट्यामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे; परंतु तो अहवाल गायब आहे. तो पाठपुरावा करूनही मिळत नाही.

२००६ मध्ये इंजिनिअर्स व आर्किटेक्टच्या सभागृहातील कार्यक्रमात अलमट्टीचा फुगवटाही महापुरास कारणीभूत आहे, असे डॉ. धुमाळ म्हणाले होते. मग आता असे बोलून ते भ्रम निर्माण का करत आहेत? मुळात धुमाळ यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून बोलण्याची गरज होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे पूरग्रस्तांमध्ये नाराजी असल्यामुळे आम्ही त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करीत आहोत. अधिकाऱ्यांनी यापुढे अभ्यास करूनच मत व्यक्त करावे.जनतेची दिशाभूल करू नयेमाजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील पुरात कर्नाटक सरकार आणि अलमट्टीतील अधिकाऱ्यांना विनंती करून अलमट्टीतून विसर्ग वाढविला होता. त्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा कमी होऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा महापुराचा धोका टळला होता, असे दोन्ही मंत्र्यांनी जाहीर केले होते. पुरास अलमट्टीच जबाबदार असल्याचे त्यांचेही ते म्हणणे होते. असे असताना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे विधान करून जनतेची दिशाभूल करू नये, असेही पाटील, दिवाण म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfloodपूरDamधरण