शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:31 IST

मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी धरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका नाही, हे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या भागाला अलमट्टी, हिप्परगी धरणामुळेच महापुराचा धोका आहे, असा दावाही महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत सोमवारी बैठक झाली. या बैठकीस महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, संजय कोरे, सतीश रांजणे, चंद्रकांत पाटील, सचिन सागरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सर्जेराव पाटील, दिवाण म्हणाले की, डॉ. हेमंत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली २००६ मध्ये आयआयटी मुंबईचे दोन प्राध्यापक आचरे आणि साठे यांच्यासोबत समिती गठित केली होती. या तिघांच्या समितीचा अहवाल प्रशासनास सादर केला आहे. या अहवालात अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याच्या फुगवट्यामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे; परंतु तो अहवाल गायब आहे. तो पाठपुरावा करूनही मिळत नाही.

२००६ मध्ये इंजिनिअर्स व आर्किटेक्टच्या सभागृहातील कार्यक्रमात अलमट्टीचा फुगवटाही महापुरास कारणीभूत आहे, असे डॉ. धुमाळ म्हणाले होते. मग आता असे बोलून ते भ्रम निर्माण का करत आहेत? मुळात धुमाळ यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून बोलण्याची गरज होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे पूरग्रस्तांमध्ये नाराजी असल्यामुळे आम्ही त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करीत आहोत. अधिकाऱ्यांनी यापुढे अभ्यास करूनच मत व्यक्त करावे.जनतेची दिशाभूल करू नयेमाजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील पुरात कर्नाटक सरकार आणि अलमट्टीतील अधिकाऱ्यांना विनंती करून अलमट्टीतून विसर्ग वाढविला होता. त्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा कमी होऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा महापुराचा धोका टळला होता, असे दोन्ही मंत्र्यांनी जाहीर केले होते. पुरास अलमट्टीच जबाबदार असल्याचे त्यांचेही ते म्हणणे होते. असे असताना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे विधान करून जनतेची दिशाभूल करू नये, असेही पाटील, दिवाण म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfloodपूरDamधरण