शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत जुलैमध्ये सर्वांत कमी पाऊस

By अशोक डोंबाळे | Updated: August 7, 2025 18:42 IST

गतवर्षीच्या तुलनेत किती टक्के पावसाची तूट.. वाचा

अशोक डोंबाळेसांगली : सर्वाधिक पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातच जिल्ह्यात पावसाची तब्बल १२२.७ टक्के तूट राहिली आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसासाठी सांगलीकरांना अजून १५ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दुष्काळी जत, आटपाडी तालुक्यात गतवर्षीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला आहे.जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यांत सर्वाधिक १९८ मिलिमीटर पाऊस जून महिन्यात होतो. त्यानंतर १३५.५ मिलिमीटर पाऊस हा जुलै महिन्यात होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला आहे. २०२४ व २०२३ या वर्षांमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिकचा पाऊस जुलै महिन्यात झाला. मात्र, यंदा जुलै महिना कोरडाच गेला आहे. जुलै महिन्यात यंदा केवळ ११७.३ मिलिमीटर म्हणजेच केवळ ८६.६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षांतील जुलै महिन्यातील पावसाची आकडेवारी पाहिल्यास जुलै २०२५ मध्ये पडलेला सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. जुलै २०२४ मध्ये २८३.६ मिलिमीटर म्हणजेच २०९.३ टक्के पाऊस झाला होता. कृष्णा, वारणा नद्यांना महापूर आला होता. अखंडित २९ दिवस पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा १६६.३ मिलिमीटर म्हणजेच १२२.७ टक्के कमी पाऊस झाला आहे.

पावसाची स्थिती

  • १०० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेले तालुके - मिरज, जत, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस
  • ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत पाऊस झालेले तालुके - जामनेर, जळगाव, एरंडोल, मुक्ताईनगर.

जुलै महिन्यातील पावसाचे प्रमाणतालुका जुलै २०२४ / जुलै २०२५पाऊस / टक्केवारी / पाऊस / टक्केवारीमिरज २३३.०४ / २४८.५ / ९५.०३ / १०६जत ५७.५ / ८२ / ७३.९ / १०५.४खानापूर १५४.३ / १५५.९ / ५९.७ / ६०.३वाळवा ४५७.८ / २७७.६ / १३१.१ / ७९.५तासगाव १९६.७ / १८४.९ / ७७.६ / ७२.९शिराळा ८६१.८ / २८१.९ / ३९०.५ / १२७.३आटपाडी ५५.७ / १३९.९ / ९४.३ / २३६.९क.महांकाळ १२७.१ / २२६. / ७२.६ / १२९.२पलूस २९४.३ / ५०२.२ / १०६.४ / १८१.६कडेगाव २५९.४ / १७३.७ / ७०.१ / ४७एकूण २८३.६ / २०९.३ / ११७.३ / ८६.६

मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे मान्सूनचे चित्र पालटले आहे. सध्या पावसासाठी पोषक वातावरण दिसून येत नाही. ऑगस्ट महिन्यात आगामी आठवडाभर तरी पावसाची शक्यता दिसून येत नाही. केवळ सांगली जिल्हाच नाही, तर राज्यातील अनेक भागांमध्ये हीच स्थिती आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो, तरी १५ ऑगस्टनंतर परिस्थिती बदलू शकते. -राहुल पाटील, हवामान तज्ज्ञ.