शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या भरपाईचे पैसे आले, सांगली जिल्हा बँकेने थकीत कर्जाला जमा केले; माजी खासदारांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:58 IST

शासनाने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी आधार व्हावा, म्हणून भरपाई दिली

सांगली : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांचे आणि द्राक्ष, डाळींब बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीत शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी शासनाकडून भरपाईचे १४३ कोटी रुपये मिळाले आहेत. पण, बँका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईतून थकीत कर्जाची वसुली करत आहेत. या प्रश्नावर माजी खासदार संजय पाटील यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन भरपाईची रक्कम कर्जाला वर्ग करू नये, अशी मागणी केली.नोव्हेंबर महिना चालू झाला तरी अवकाळी पावसाचे आगमन होतच आहे. अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामातील पीक पावसाच्या पाण्यात सडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी आधार व्हावा, म्हणून भरपाई दिली आहे. अतिवृष्टीचे जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये १४३ कोटी रुपये जमा झाले आहेत. काही बँकांनी ही भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात वर्ग केली आहे. पण, बहुतांशी शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम त्यांच्या थकीत कर्जाला वर्ग केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.म्हणून संजय पाटील यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन अतिवृष्टीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली पाहिजे. थकीत कर्जाला पैसे जमा करून घेऊ नयेत, अशी मागणी केली. त्यानुसार वाघ यांनी शेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यावरच वर्ग होईल, असे आश्वासन दिले.

पुन्हा बैठकअतिवृष्टीच्या भरपाईची रक्कम थकीत कर्जाला वर्ग करण्याच्या बँकांच्या धोरणाला माजी खासदार संजय पाटील, राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. हे दोन्ही माजी खासदार आज पुन्हा जिल्हा बँकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिवृष्टीच्या भरपाईतून थकीत कर्जाला पैसे वर्ग करू नयेत, अशी भूमिका मांडणार आहे, असे संजय पाटील यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli farmers' flood relief diverted to loan repayment; leaders protest.

Web Summary : Flood-hit Sangli farmers' relief funds are being used to repay loans. Ex-MP Sanjay Patil protested, demanding direct transfers to farmers' accounts. Bank assured action.