शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सांगली जिल्ह्यात १०३ गावांना अतिवृष्टी, महापुराचा दणका, वाळवा, शिराळा, पलूसमध्ये सर्वाधिक हानी; व्यापारी पेठेचे कंबरडे मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 11:19 IST

Flood in Sangli 2021: प्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील १६ हजार हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त केली आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यांत शेतातील माती वाहून जमिनीतील खडक उघडे पडले आहेत.

- संतोष भिसेसांगली : प्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील १६ हजार हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त केली आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यांत शेतातील माती वाहून जमिनीतील खडक उघडे पडले आहेत. नदीकाठची मळीची दोन-पाच गुंठे शेेती वाहून गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सांगलीच्या व्यापारी पेठेलाही मोठा दणका बसला आहे.२०१९ च्या हानीतून सावरण्यापूर्वीच यंदा पुन्हा महापूर आल्याने जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस व तासगाव तालुक्यांतील नदीकाठच्या १०३ गावांत कृष्णा-वारणेने थैमान घातले, तर त्याशिवाय दहा गावांत अतिवृष्टी झाली. कोयना व चांदोली धरणांतून सोडलेल्या पाण्याने हाहाकार उडवला. आतापर्यंत १६ हजार ८७९ कुटुंबांच्या नुकसानीची माहिती नोंदविण्यात आली आहे. शिराळा तालुक्यात मणदूर, भाष्टेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, विठ्ठलवाडी, देववाडी, ठाणापुडे, डफळेवाडी, बोरगेवाडी या गावांलगतचे डोंगर खचले असून तळीयेसारख्या दुर्घटनेचे सावट आहे. महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागात ४५ हजार ३५२ कुटुंबांना पुराचा फटका बसला. २८७ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. दीड हजार घरांची पडझड झाली आहे. पलूस व वाळवा तालुक्यांत पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने ५० हजार कोंबड्या मरण पावल्या. प्रशासनाने पंचनामे गतीने सुरू केले असले तरी मिळणारी मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी पुरेशी असणार नाही. नदीकाठी अनेक शेतकऱ्यांकडे पाच-दहा गुंठ्यांची शेती आहे. नदीच्या वेगवान प्रवाहाने ती खरडून काढली, त्यामुळे शेती वाहून गेली असून, हे शेतकरी कागदावरच शेतीचे मालक राहिले आहेत. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९८ गावांना, शिराळ्यात ९५, तर मिरज व पलूस तालुक्यांत प्रत्येकी २६ गावांना पुराचा फटका बसला. अतिवृष्टीने तासगावमध्येही दोन गावांत नुकसान झाले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर