शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

सांगली : अंकलगीतील बेपत्ता तरुणाच्या आजीचा मृत्यू, अन्न-पाणी होते सोडले, गावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:05 IST

अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

ठळक मुद्देअपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाईची मागणीधसका घेऊन अन्न ग्रहण न केल्याने आजी भौरव्वा यांचे निधन

संख/माडग्याळ : अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

संंतप्त ग्रामस्थांनी त्यांचा अंंत्यविधी न करता मृृतदेह उमदी पोलिस ठाण्यासमोर नेण्याचा पवित्रा घेतला. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी समजूत घातल्याने दुुपारी उशिरा अंंत्यविधी उरकण्यात आला.पूर्व भागातील अंकलगी येथील शेतमजूर असलेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट याला २६ आॅक्टोबरला शेजारील तानाजी चिदानंद कोळी यांनी, संख येथे जाऊन येऊ म्हणून नेले आहे. तेव्हापासून तो गायब झाला आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यामध्ये गायब झाल्याची फिर्याद भाऊ सुरेश अक्कलकोट यांनी दिली आहे.

पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर जुजबी कारवाई करण्यात आली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यांनी गावातील मुकादम म्हाळाप्पा मलकाप्पा अजमाने यांच्या ताब्यात दिले आहे, असे सांगितले आहे. कोळी हा अजमानेकडे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करीत आहे. कऱ्हाड येथे घेऊन गेला आहे, असा जबाब दिला आहे; पण आजतागायत तो बेपत्ता आहे.

राघवेंद्र याचे मोबाईल लोकेशन व तानाजी कोळी यांच्या मोबाईल लोकेशनवरून, बेपत्ताचे लोकेशन दोन दिवसात कºहाड दाखविते. त्यामुळे संशय वाढला होता. यापूर्वी ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्यावर १८ नोव्हेंबरला मोर्चा काढला होता. त्यावेळी मंगळवारपर्यंत शोध घेतो, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

संशयित आरोपीस अटक करून लगेच सुटका केली आहे. त्यांनी गावात येऊन राघवेंद्रप्रमाणे कुटुंबातील अन्य मुलांचेही अपहरण करण्याची धमकी दिली आहे. गावातील पालकही दहशतीखाली होते. पोलिसांच्या मतानुसार, आरोपी गुन्हा कबूल करत नाहीत. त्यामुळे तपास रखडला आह असे पोलिसांचे मत आहे.कारवाईची मागणीअपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन केले. सलग दोन दिवस पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली