शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

सांगली : अंकलगीतील बेपत्ता तरुणाच्या आजीचा मृत्यू, अन्न-पाणी होते सोडले, गावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:05 IST

अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

ठळक मुद्देअपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाईची मागणीधसका घेऊन अन्न ग्रहण न केल्याने आजी भौरव्वा यांचे निधन

संख/माडग्याळ : अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

संंतप्त ग्रामस्थांनी त्यांचा अंंत्यविधी न करता मृृतदेह उमदी पोलिस ठाण्यासमोर नेण्याचा पवित्रा घेतला. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी समजूत घातल्याने दुुपारी उशिरा अंंत्यविधी उरकण्यात आला.पूर्व भागातील अंकलगी येथील शेतमजूर असलेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट याला २६ आॅक्टोबरला शेजारील तानाजी चिदानंद कोळी यांनी, संख येथे जाऊन येऊ म्हणून नेले आहे. तेव्हापासून तो गायब झाला आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यामध्ये गायब झाल्याची फिर्याद भाऊ सुरेश अक्कलकोट यांनी दिली आहे.

पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर जुजबी कारवाई करण्यात आली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यांनी गावातील मुकादम म्हाळाप्पा मलकाप्पा अजमाने यांच्या ताब्यात दिले आहे, असे सांगितले आहे. कोळी हा अजमानेकडे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करीत आहे. कऱ्हाड येथे घेऊन गेला आहे, असा जबाब दिला आहे; पण आजतागायत तो बेपत्ता आहे.

राघवेंद्र याचे मोबाईल लोकेशन व तानाजी कोळी यांच्या मोबाईल लोकेशनवरून, बेपत्ताचे लोकेशन दोन दिवसात कºहाड दाखविते. त्यामुळे संशय वाढला होता. यापूर्वी ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्यावर १८ नोव्हेंबरला मोर्चा काढला होता. त्यावेळी मंगळवारपर्यंत शोध घेतो, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

संशयित आरोपीस अटक करून लगेच सुटका केली आहे. त्यांनी गावात येऊन राघवेंद्रप्रमाणे कुटुंबातील अन्य मुलांचेही अपहरण करण्याची धमकी दिली आहे. गावातील पालकही दहशतीखाली होते. पोलिसांच्या मतानुसार, आरोपी गुन्हा कबूल करत नाहीत. त्यामुळे तपास रखडला आह असे पोलिसांचे मत आहे.कारवाईची मागणीअपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन केले. सलग दोन दिवस पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली