शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अंकलगीतील बेपत्ता तरुणाच्या आजीचा मृत्यू, अन्न-पाणी होते सोडले, गावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:05 IST

अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

ठळक मुद्देअपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाईची मागणीधसका घेऊन अन्न ग्रहण न केल्याने आजी भौरव्वा यांचे निधन

संख/माडग्याळ : अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

संंतप्त ग्रामस्थांनी त्यांचा अंंत्यविधी न करता मृृतदेह उमदी पोलिस ठाण्यासमोर नेण्याचा पवित्रा घेतला. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी समजूत घातल्याने दुुपारी उशिरा अंंत्यविधी उरकण्यात आला.पूर्व भागातील अंकलगी येथील शेतमजूर असलेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट याला २६ आॅक्टोबरला शेजारील तानाजी चिदानंद कोळी यांनी, संख येथे जाऊन येऊ म्हणून नेले आहे. तेव्हापासून तो गायब झाला आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यामध्ये गायब झाल्याची फिर्याद भाऊ सुरेश अक्कलकोट यांनी दिली आहे.

पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर जुजबी कारवाई करण्यात आली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यांनी गावातील मुकादम म्हाळाप्पा मलकाप्पा अजमाने यांच्या ताब्यात दिले आहे, असे सांगितले आहे. कोळी हा अजमानेकडे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करीत आहे. कऱ्हाड येथे घेऊन गेला आहे, असा जबाब दिला आहे; पण आजतागायत तो बेपत्ता आहे.

राघवेंद्र याचे मोबाईल लोकेशन व तानाजी कोळी यांच्या मोबाईल लोकेशनवरून, बेपत्ताचे लोकेशन दोन दिवसात कºहाड दाखविते. त्यामुळे संशय वाढला होता. यापूर्वी ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्यावर १८ नोव्हेंबरला मोर्चा काढला होता. त्यावेळी मंगळवारपर्यंत शोध घेतो, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

संशयित आरोपीस अटक करून लगेच सुटका केली आहे. त्यांनी गावात येऊन राघवेंद्रप्रमाणे कुटुंबातील अन्य मुलांचेही अपहरण करण्याची धमकी दिली आहे. गावातील पालकही दहशतीखाली होते. पोलिसांच्या मतानुसार, आरोपी गुन्हा कबूल करत नाहीत. त्यामुळे तपास रखडला आह असे पोलिसांचे मत आहे.कारवाईची मागणीअपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन केले. सलग दोन दिवस पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली