शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सांगली : भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले; पाण्यासाठी अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:02 AM

सांगली शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्दे भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले पाण्यासाठी अधिकारी धारेवर

सांगली : शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर बिले कशाला देता? असा सवालही त्यांनी केला.स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा सुरू होती. दुपारी साडेबारा वाजता भारतनगरमधील नागरिक, महिला पाण्याचा नियमित पुरवठा करावा, यासाठी महापालिकेत आल्या. त्यांनी थेट स्थायी समितीचे सभागृहच गाठले. सभापती सातपुते, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह सदस्यांसमोर नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले.भारतनगरला तीन महिन्यांपासून अपुरे, अनियमित व कमीदाबाने पाणी येते. याबाबत तक्रारी केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून एखादा दिवस नियोजन होते, पुन्हा तीच परिस्थिती कायम आहे. नदीत मुबलक पाणी आहे, मग पाणी कुठे मुरते? तुमच्या नियोजनातच घोळ असल्याचा आरोप महिलांनी केला.

यावेळी सदस्य शिवराज बोळाज यांनीही पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना जाब विचारला. त्यानंतर मागासवर्गीय समितीच्या कार्यालयात नागरिक, नगरसेवक व उपाध्ये यांची बैठक झाली.

उपाध्ये यांनी बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत आंदोलकांना शांत केले. परंतु नागरिकांनी जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर बिलांवर बहिष्कार घालू, असा पवित्रा घेतला. त्यानंतर नागरिक व महिलांनी महापौर हारुण शिकलगार यांची भेट घेतली.

जर पाणी मिळत नसेल तर पाणीबिले पाठविणेच बंद करावे. आतापर्यंत आलेली बिले माफ करावीत, अशी मागणी केली. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका