शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सांगली :  ​ढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 6:46 PM

मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिलकिलोला सहा ते आठ रुपये दर लाखोंचा खर्च वाया जाण्याचे संकेत

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.भर उन्हाळा असताना मल्चिंग पेपर, ठिबक, औषधे, खते, मजुरीवर प्रतिएकरी एक लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना खर्च येत आहे. उन्हाळ्यामुळे उत्पादनही घसरले आहे. यात भर म्हणून पुन्हा राज्यातील सर्व बाजारात ढोबळी मिरचीचे दर घसरले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत प्रतिकिलो ३० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत होता. सध्या केवळ प्रतिकिलोला सहा ते आठ रुपये दर मिळत आहे.

उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावरच ढोबळी मिरची टाकण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक खर्चही मोठ्याप्रमाणात असल्यामुळे ढोबळी मिरची मुंबई, पुणे येथील बाजारपेठेपर्यंत अल्पदरात पाठवणे परवडत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

जिल्ह्यातील मिरज पश्चिम भागामध्ये तुंग, कसबे डिग्रज, आष्टा, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, पलूस, आटपाडी, तासगाव, कडेगाव तालुक्यातही शेतकरी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहे. यामुळे या सर्वच शेतकऱ्यांना दर घसरल्याचा फटका बसला आहे.

व्यापाºयांच्या मनमानी कारभाराकडे कृषीमंत्र्यांनीच लक्ष द्यावेमुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार पेठेतील दलाली शासनाने बंद केली आहे. यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. येथील बाजारपेठेत दलालाने सौदे बंद केल्यामुळे ढोबळी मिरचीचे दर घसरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दलाल आणि व्यापारी एकत्रित येऊनच शेतीमालाचे दर पाडत असल्यामुळे यांचा बंदोबस्त कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करावा, अशी मागणीही शेतकरी करू लागले आहेत.​

टॅग्स :Sangliसांगलीvegetableभाज्या