शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

सांगलीतील कलाकारांनी साकारला ‘पोशिंदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 5:04 PM

लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे तत्व मांडतानाच बळीराजाचे महत्त्व, त्याच्यासमोरील समस्या आणि अंध:कारमय भविष्य अशा सर्व गोष्टींना स्पर्श करणारा एक लघुपट सांगलीच्या कलाकारांनी नुकताच साकारला आहे. विशेष म्हणजे यासाठी हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांचे व समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून हा लघुपट सोशल मिडियावर मोफत व्हायरल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलघुपटात शेतकऱ्याच्या जगण्याची धडपड हा धागा कलाकार वृषभ आकिवाटे यांनी केली लघुपटाची निर्मिती राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेत लघुपटाचे प्रकाशन

सांगली ,दि. ३१:  लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे तत्व मांडतानाच बळीराजाचे महत्त्व, त्याच्यासमोरील समस्या आणि अंध:कारमय भविष्य अशा सर्व गोष्टींना स्पर्श करणारा एक लघुपट सांगलीच्या कलाकारांनी नुकताच साकारला आहे. विशेष म्हणजे यासाठी हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांचे व समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून हा लघुपट सोशल मिडियावर मोफत व्हायरल करण्यात आला आहे.

सांगलीतील कवी व एकपात्री प्रयोग करणारे कलाकार वृषभ आकिवाटे यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांनी लघुपटाचे प्रकाशन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा .राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेतच केले. शेट्टी यांनी हा लघुपट पाहिला होता. त्यामुळे त्यांनी ऊस परिषदेतच शेतकऱ्याना तो लघुपट जाणीवपूर्वक पाहण्याची विनंती केली.

शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे. जगाला जगवणाऱ्या  शेतकऱ्याच्या जीवनात सुरू असलेल्या विचित्र घडामोडी आणि त्यातून त्याची चाललेली जगण्याची धडपड हा धागा पकडून लघुपट अत्यंत चांगल्या पद्धतीने रंगविला आहे. वास्तवदर्शी असलेला हा लघुपट शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. हा लघुपट विराज प्रोडक्शनने सादर केला आहे.

आप्पासो आकिवाटे, कमल आकिवाटे हे निर्माते आहेत . दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले असून लेखन वृषभ आकिवाटे, प्रा .पी. बी.पाटील यांनी केले आहे . कॅमेराची धुरा शीतल पाटील यांनी सांभाळली आहे. स्थानिक कलाकारांना या लघुपटात संधी देण्यात आली आहे .

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी