शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मला रात्री उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि...; चंद्रहार पाटलांनी सांगितला चर्चेचा तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 14:54 IST

सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीतून नक्की कोण लढणार, याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

Chandrahar Patil ( Marathi News ) : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण जागावाटप निश्चित होण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेवरून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत या जागेवरील दावा सोडू नये, अशी मागणी केली. त्यामुळे सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीतून नक्की कोण लढणार, याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अशातच  चंद्रहार पाटील यांनी आपल्याला काल उद्धव ठाकरे यांचा फोन आला असल्याचं सांगत त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले की, "सांगली लोकसभेबाबत वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे, याची मला कल्पना नाही. मात्र काल मला उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता आणि यावेळी आमची २१ तारखेला सांगलीत होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली आहे. आम्ही या सभेच्या तयारीला लागलो आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करणार आहोत," असं म्हणत पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, काँग्रेसने या जागेवरील दावा सोडलेला नसताना चंद्रहार पाटील यांनीही आपली उमेदवारी निश्चित असल्याचं सांगितल्याने सांगलीवरून महाविकास आघाडीत धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेसाठी हट्ट करू नये; काँग्रेसची आक्रमक भूमिका 

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. "सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये. सांगलीत आज ६०० गावे आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वानं सांगावे, यातील १० टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का? कुठल्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही. टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ, परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचे ठाम मत आहेत," असं कदम यांनी म्हटलं आहे.

विश्वजित कदम यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही नुकतीच बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले होते की, "कुठल्या जागेबदली कोणती जागा द्यावी हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण, समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागते आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. चंद्रहार पाटील यांनी ६-७ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाची मागणी चुकीची आहे," असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस