शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तासगावच्या सूतगिरणीस ३८ लाखांची कर्ज सवलत

By admin | Updated: August 30, 2015 22:35 IST

संचालक मंडळाचा निर्णय : अनेक संस्थांना लाभ--जिल्हा बँक गैरव्यवहार-१

सांगली : संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीवरून सध्या चर्चेत असलेल्या तासगावच्या स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ३८ लाख ९ हजार रुपयांची कर्ज सवलत दिली होती. १५७ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात या कर्ज सवलतीला १३ संचालकांना जबाबदार धरण्यात आले आहे. ‘रामानंद भारती’प्रमाणेच अनेक संस्थांवर कर्ज सवलतीचा वर्षाव तत्कालीन संचालक मंडळाने केला आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव येथे स्वामी रामानंद भारती या सूतगिरणीची उभारणी केली. त्यांच्या निधनानंतर ही संस्था या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. बिनविरोध निवडीचे प्रकरण सध्या न्यायालयात गेले असतानाच, जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणात या सूतगिरणीला दिलेल्या सवलतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. जिल्हा बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी, स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीस ज्या संस्थांवर कर्ज सवलतीचा वर्षाव करण्यात आला, त्या बहुतांश प्रकरणांचा समावेश आरोपपत्रात करुन त्यांनी तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरले आहे. या संस्थेस २७ एप्रिल २00७ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन ३८ लाख ९ हजार रुपयांची कर्ज सवलत दिल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. याप्रकरणी निर्णयप्रक्रियेत असलेल्या तत्कालीन १३ संचालकांना जबाबदार धरले आहे. यामध्ये आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, बँकेचे विद्यमान संचालक प्रा. सिकंदर जमादार, मोहनराव कदम, दिनकरराव हिंदुराव पाटील, लालासाहेब यादव, जगन्नाथ म्हस्के, विजय सगरे आदी नेत्यांचा समावेश आहे. दोन आमदार आणि दोन विद्यमान संचालक या प्रकरणात अडकले आहेत. (प्रतिनिधी)सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी नुकतेच १00 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. ९६ पानी आरोपपत्र आणि १८ पानी नोटीस तयार केली आहे. आरोपपत्रात त्यांनी नुकसानीसाठी सात विद्यमान संचालक, ३६ माजी संचालक, ५0 वारसदार आणि ७ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. आरोपपत्रातील विविध प्रकरणांवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून....