शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेकरांचा तेजस्वी हिरा निखळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST

रेठरे धरण गावचे माजी सरपंच दत्तू ज्ञानू पाटील-पैलवान आनंदराव काकांचे वडील. त्यांच्या निधनानंतर १९९२ मध्ये तरुणपणात असणाऱ्या आनंदराव ...

रेठरे धरण गावचे माजी सरपंच दत्तू ज्ञानू पाटील-पैलवान आनंदराव काकांचे वडील. त्यांच्या निधनानंतर १९९२ मध्ये तरुणपणात असणाऱ्या आनंदराव पाटील यांच्यावर कुटुंबासह आजवर माहीत नसलेल्या राजकारणाचीही जबाबदारी पडली; परंतु पहिल्यांदा आपली आर्थिक स्थिती मजबूत झाली पाहिजे, या विचारातून त्यांनी वडिलांनी सुरू केलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात लक्ष घातले. व्यवसायात भरभराट केली तसेच शेतीकडेही लक्ष दिले.

१९९५ मध्ये त्यांनी आपले लहान बंधू दादासाहेब पाटील यांच्या साथीने ट्रान्सपोर्ट व्यवसायाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले. यामुळे गाव व परिसरातील शंभरावर तरुणांना काम मिळाले. हळूहळू २००० सालानंतर राजकारणात सक्रिय झाले. पुणे राजारामबापू साखर कारखान्याचे संचालकपद मिळाल्यानंतर त्यांनी राजारामबापू उद्योग समूहात गावातील व परिसरातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील सुमारे दोनशेहून अधिक तरुणांना नोकरी मिळवून दिली. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हातभार लावला.

रेठरे धरण ग्रामपंचायतीत पॅनेल निवडून आणून त्यांनी मागासवर्गीय, तसेच माळी समाजातील व सर्वसाधारण समाजातील व्यक्तींना सरपंच पदाची संधी दिली. स्वतः गावाचे सरपंचपद भूषवून गावातील विकासकामांना गती दिली. गावात व्यवहार करण्यासाठी बँक नव्हती. १९९५ साली काकांनी गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक साक्षर केले. गावातील रस्ते, नाले, बोळ काँक्रिटीकरण, सुशोभिकरण आदी कामे करून कामाची चुणूक दाखविली.

कारखान्याचे संचालक पद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी व युवकांना विविध महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी सहाय्य केले. हाेतकरु मुलांना फी भरण्यासाठी मदत केली, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. शेतातील पिकांना पाणी मिळावे, यासाठी गावात सुमारे ११० विहिरी जवाहर रोजगार योजनेतून मंजूर करून खोदल्या, घर नसलेल्या सुमारे १३० कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून राहण्यासाठी घरे बांधून दिली.

गावातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन प्राथमिक उपकेंद्र बांधण्यासाठी पुढाकार घेतला. राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून गावात दोन व्यायामशाळा उभारण्यात आल्या. गावचे ग्रामदैवत असलेल्या जोतिबा मंदिराचे भव्य बांधकाम व जीर्णोद्धार, रेणुका मंदिर, दुर्गामाता मंदिर, सिद्धेश्वर मंदिर उभारण्यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. देखणी मंदिरे उभी केली. रेठरे धरण पाणलोट क्षेत्र व ओढ्यावर त्यांच्याच पाठपुराव्याने सुमारे पन्नासहुन अधिक बंधारे बांधले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.

गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोरणा धरण शिराळा-पाडळी येथून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर पाइपलाइन करून आणली. राष्ट्रीय पेयजल योजनेतून चार कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना आनंदराव काका यांनी पूर्णत्वास नेली.

जवळचे नातलग असलेले राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील-साहेब यांना आपले दैवत व गुरू मानत आनंदराव पाटील यांनी नेहमीच त्यांचा आदर केला, तसेच आमदार मानसिंगराव नाईकभाऊ यांच्या माध्यमातूनही आनंदराव पाटील काकांनी विविध कामे खेचून आणत गावचा विकास साधला. यातच त्यांचा उमदेपणा दिसून येत होता. त्यांच्या अपघाती निधनाने गावच्या विकासात कधीही भरुन न येणारी पाेकळी निर्माण झाली आहे.

- मानाजी धुमाळ, रेठरे धरण.