शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; 'अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका'

By अशोक डोंबाळे | Updated: July 18, 2024 17:08 IST

महापूर नियंत्रण समितीकडून मुख्य सचिवांना निवेदन : १ ऑगस्टला नृसिंहवाडी, सांगलीत जलबुडी आंदोलन

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाणीसाठा केला आहे. या पाणीसाठ्यामुळेसांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्नाटक पाटबंधारे विभागाला अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच १ ऑगस्टला नृसिंहवाडी, सांगलीत जलबुडी आंदोलन करण्याचा इशारा निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिला.कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यांमध्ये कर्नाटक शासनाचा जलसंपदा विभाग केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून भरमसाट पाणीसाठा करीत आहे. कृष्णा खोऱ्यातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. अलमट्टीत पाणीसाठा केल्यामुळे महापुराचा धोका निर्माण होत आहे.याबाबत आम्ही वारंवार जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे सांगली व कोल्हापूरमधील कार्यकारी अभियंता यांना निवेदने दिली आहेत. आंदोलने केली आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. म्हणून आम्ही दि. १ ऑगस्ट रोजी नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदीत आणि सांगलीत कृष्णा नदीत जलबुडी आंदोलन करणार आहोत. शेकडो नागरिक आणि शेतकरी जलबुडी आंदोलनात सहभागी होणार आहेत. निवेदनावर निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील आदींच्या सह्या आहेत.

जनहित याचिका दाखल करणारसांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आम्ही कायदेशीर नोटीस दिली आहे. दि. २६ जुलैपर्यंत वाट पाहून आम्ही त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

पावसाची सहा नक्षत्रे शिल्लक, तोपर्यंत धरण भरलेपावसाळ्यातील नऊ नक्षत्रे ही पावसाची म्हणून ओळखली जातात. पहिली तीन नक्षत्रेही अजून संपलेली नाहीत. याचा अर्थ पावसाळा सुरू होऊन अजून जेमतेम दोन महिनेसुद्धा झालेले नाहीत. जोरदार पावसाची सहा नक्षत्रे अजून शिल्लक आहेत. तरीही कर्नाटक सरकार व तेथील जलसंपदा विभाग घाई करून धरणात पाणीसाठा वाढवत असून, त्यांची ही कृती अत्यंत धोकादायक आहे, असा आरोपही सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणीfloodपूर