शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

जिल्ह्यात शालेय पोषण आहार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शालेय पोषण आहाराचा धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीमधील दोन लाख ७७ हजार विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. सांगली, मिरज शहरातील काही माध्यमिक शाळांमध्ये पोषण आहाराचे वाटपच बंद असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये उधारीवर कसेबसे हे काम सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शालेय पोषण आहाराचा धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीमधील दोन लाख ७७ हजार विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. सांगली, मिरज शहरातील काही माध्यमिक शाळांमध्ये पोषण आहाराचे वाटपच बंद असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये उधारीवर कसेबसे हे काम सुरू आहे. पुरवठा कंत्राटदाराची करारनाम्याची मुदत जूनमध्येच संपल्यामुळे त्यांनी पुरवठा बंद केला आहे.जिल्ह्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या २५०९ शाळांमध्ये पोषण आहाराचे लाभार्थी पहिली ते पाचवी एक लाख ६५ हजार आणि सहावी ते आठवीमधील एक लाख १२ हजार विद्यार्थी आहेत. या शाळांना धान्य आणि इतर मसाला, कडधान्य, चटणी, मीठ आदी पुरवठ्याचा ठेका बीड येथील मधुसूदन एजन्सीजला राज्य शासनाकडून मिळालेला होता. पुरवठा कंत्राटदार व शासनाच्या करारनाम्याची मुदत जूनपर्यंत होती. शालेय पोषण आहारात तांदूळ व धान्य आणि इतर मालाचा समावेश आहे. एजन्सीचा करार संपल्यामुळे त्यांनी पुरवठा बंद केला. मात्र त्यांनी दिलेल्या मालावर सप्टेंबरपर्यंत शाळांमधील शालेय पोषण आहार कसातरी चालू होता. सध्या अनेक शाळेत साहित्याचा साठा संपला आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील पैसे खर्च करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. काही शाळेत पोषण आहार देणे सुरु आहे, तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती मिळाली.१३ जुलैला शाळांनी हे साहित्य खरेदी करावे, अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या. यात ग्रामीण शाळांचा समावेश आहे. शहरी शाळेत शाळांना निधी देण्यात येतो. १ आॅगस्टपासून तशा सूचना पोषण आहार विभागाने शाळांना दिल्या होत्या. दिवाळी सुटीनंतर शाळा सुरु होऊन एक आठवडा संपला आहे. हे साहित्य खरेदी करून ते संबंधित बचत गटांना देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. परंतु, माल खरेदीसाठी मुख्याध्यापकांना आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर जाऊन नोव्हेंबर उजाडला तरीही पैसे दिलेले नाहीत. शासनाकडून पैसे मिळत नसतील तर मुख्याध्यापकांनी साहित्य कसे खरेदी करायचे?, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काही शाळांमधील पोषण आहार बंद पडल्याची माहिती मिळाली.मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्या तरी, पोषण आहार सध्या शिजत नसल्याची माहिती आहे. राज्य शासनाचे चुकीचे धोरणच याला जबाबदार असल्याच्या तक्रारी पालक आणि मुख्याध्यापकांनी केल्या आहेत.दहापैकी केवळ दोनच अधीक्षक कार्यरतविद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व्यवस्थित दिला जातो की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने दहा तालुक्यांसाठी दहा अधीक्षकांची नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात दहापैकी जत, मिरज आणि तासगाव येथील अधीक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी तासगावच्या अधीक्षक काही दिवसांपासून रजेवर आहेत. सध्या केवळ दोनच अधीक्षक कार्यरत असून, त्यांच्यावर दहा तालुक्यांची जबाबदारी आहे. यातच पुन्हा जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावरील महिन्याला शासनाच्या बैठकांनाही त्यांना हजर रहावे लागत आहे. यामुळे शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरवठा होतो की नाही, याकडे त्यांचे लक्षच नाही. याचाच काही शाळा गैरफायदाही घेत असून, बोगस बिले काढण्याचे प्रकारही घडत असल्याच्याही तक्रारी काही मुख्याध्यापकांनी केल्या आहेत.मुख्याध्यापक आर्थिक तरतूद कशी करणार?प्राथमिक पहिली ते पाचवीच्या प्रति विद्यार्थ्यासाठी धान्य आणि इतर माल पुरविण्यासाठी २.६२ रुपये, इंधन आणि भाजीपाला यासाठी १.५१ रुपये खर्च शासनाने मंजूर केला आहे. उच्च प्राथमिक सहावी ते आठवीच्या प्रति विद्यार्थ्यासाठी ४.०१ रुपये आणि इंधन आणि भाजीपाल्यासाठी २.१७ रुपये अशी तरतूद केली आहे. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी केवळ धान्यादी आणि इंधन व भाजीपाल्याचा खर्च सुमारे १३ लाख ८५ हजार ३४० रुपयांचा आहे. तीन महिन्यांचे नऊ कोटी ९७ लाख राज्य शासन केवळ सांगली जिल्ह्यातील शाळांचे देणे आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात उधारीवर मुख्याध्यापक खर्च कसा करणार आहेत?, असा प्रश्न शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद