शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:58 PM

सांगली : शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय असून, पोलिसांनी बेसिक ‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिले. पोलिस ठाण्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीला सौजन्याची वागणूक देऊन त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी. केवळ कच्ची नोंद करुन घेऊ नका. अनिकेत कोथळेच्या प्रकरणावरुन आत्मपरीक्षण करुन पोलिस ...

सांगली : शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय असून, पोलिसांनी बेसिक ‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिले. पोलिस ठाण्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीला सौजन्याची वागणूक देऊन त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी. केवळ कच्ची नोंद करुन घेऊ नका. अनिकेत कोथळेच्या प्रकरणावरुन आत्मपरीक्षण करुन पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही काळम यांनी केले.घरफोड्यांसह अन्य गुन्ह्यांचा आढावा व त्यावर उपाययोजना करण्यासाठी काळम यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, डॉ. दीपाली काळे, सराफ असोसिएशनचे किशोर पंडित, व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत डोंबाळे, नगरसेविका अश्विनी कांबळे, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीता मोरे, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे बापूसाहेब पाटील उपस्थित होते.काळम-पाटील म्हणाले की, एखादी घटना घडली आणि तक्रार देण्यास व्यक्ती आल्यानंतर त्याची कच्ची नोंद घेतली जात असल्याच्या तक्रारी आहेत. पण कच्ची नोंद हे कायद्यात नाही. यापुढील काळात पोलिसांनी प्रत्येक तक्रारीची नोंद करावी; अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल. हातात काठी व डोक्यावर टोपी, शिस्तबद्धपणा दाखविला पाहिजे. ‘सीसीटीव्ही’ ही काळाजी गरज आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन समितीमधून दिला जाईल. निधी कमी पडल्यास शासनस्तरावरुन मिळवून दिला जाईल. बिअर बार, हॉटेल याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसतील, तर त्यांना परवाने देऊ नका. कोथळे प्रकरणानंतर पोलिसांविषयी चर्चा वाईट आहे. पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी जनसंपर्क वाढवावा. जनताच मदतीसाठी येत असते, हे लक्षात घेऊन बेसिक पोलिसिंगवर भर द्यावा. एखाद्या प्रकरणावरून पोलिसांचे खच्चीकरण होणार नाही, जनताही ते करणार नाही, असे डोळ्यासमोर ठेवून पोलिसांनी भविष्यात काम केले पाहिजे.बैठकीस उपस्थित नगरसेवक, व्यापारी व विद्यार्थी प्रतिनिधींची मते काळम यांनी जाणून घेतली. उपअधीक्षक धीरज पाटील यांनी पोलिसांनी केलेल्या कारवार्इंची माहिती दिली. सातत्याने नाकाबंदी केली जात आहे, असेही सांगितले.कोठडीतील मृत्यू खपवून घेणार नाहीकाळम म्हणाले, यापुढे कोठडी व तुरुंगातील संशयित आरोपींचे मृत्यू खपवून घेतले जाणार नाहीत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिकाºयांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. पोलिसांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी लागणारा निधी दिला जाईल. पोलिस शांतता व सुव्यवस्थेबाबत प्रयत्नशील आहेत. पण अनिकेत कोथळे प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या चोºयांना आळा घालण्यासाठी गस्त पथक वाढविणे, नवीन पोलिस चौक्या स्थापन करणे, मुख्य बाजारपेठेत गस्त वाढविणे यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिस प्रशासनाला समाजातील सर्व घटकांनी मदत करावी.

टॅग्स :Crimeगुन्हा