शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कृपया 'या' वस्तूंची आवश्यकता आहे, मदतनीसांना सांगली मनसे जिल्हाध्यक्षांच आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 14:03 IST

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे कोल्हापूर आणि सांगतीलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत

सांगली - गावातील प्रत्येक घरात चिखलाचा खच झालाय. घरातील गृहपयोगी वस्तू नष्ट झाल्या आहेत. सुरुवातीला घर साफ करण्यासाठी वस्तू हव्या आहेत. अत्यावश्यक गोष्टींमध्ये ट्युबलाईट, बल्ब, रोगराईपासून बचावासाठी मास्क, खराटे, फिनेल, प्लास्टीकच्या वस्तू. रोगराई पसरु नये यासाठी अंडरगारमेंट, नॅपकीन्स, पॅड या वस्तू अत्यंत आवश्यक आहेत, असे सांगलीचेमनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. यावेळी मनसेठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हेही त्यांच्यासमवेत होते. पूरग्रस्त भागातील निरीक्षण नोंदविल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं आहे. 

राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मदत येत आहे. मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. मदतीचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे. पण, नेमकी गरज कशाची हवीय? हेही मदत देणाऱ्या बांधवांनी लक्षात घ्यायला हवं. सध्या, एकाच प्रकारची मदत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या शहरातून येत आहे. तर, ग्रामीण भागातूनही याच प्रकारची मदत येते आहे. गहू, तांदुळ, साखर या किराणा मालाची गरज आहेच, पण सध्या गरज आहे ती आरोग्याकडे लक्ष देण्याची. त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वच्छतापूरक वस्तूंची सध्या गरज असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. 

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे कोल्हापूर आणि सांगतीलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत. या भागातील मतदकार्यावेळी निरीक्षण नोंदविल्यानंतर अविनाश जाधव आणि तानाजी सावंत यांनी मदत करणाऱ्या संस्था आणि दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे. त्यानुसार, मदतीच वर्गीकरणाबाबत त्यांनी मार्गदर्शन आणि आवाहन केलं आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईMNSमनसेthaneठाणेSangliसांगलीKolhapur Floodकोल्हापूर पूर