शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

कृपया 'या' वस्तूंची आवश्यकता आहे, मदतनीसांना सांगली मनसे जिल्हाध्यक्षांच आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 14:03 IST

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे कोल्हापूर आणि सांगतीलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत

सांगली - गावातील प्रत्येक घरात चिखलाचा खच झालाय. घरातील गृहपयोगी वस्तू नष्ट झाल्या आहेत. सुरुवातीला घर साफ करण्यासाठी वस्तू हव्या आहेत. अत्यावश्यक गोष्टींमध्ये ट्युबलाईट, बल्ब, रोगराईपासून बचावासाठी मास्क, खराटे, फिनेल, प्लास्टीकच्या वस्तू. रोगराई पसरु नये यासाठी अंडरगारमेंट, नॅपकीन्स, पॅड या वस्तू अत्यंत आवश्यक आहेत, असे सांगलीचेमनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. यावेळी मनसेठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हेही त्यांच्यासमवेत होते. पूरग्रस्त भागातील निरीक्षण नोंदविल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं आहे. 

राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मदत येत आहे. मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. मदतीचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे. पण, नेमकी गरज कशाची हवीय? हेही मदत देणाऱ्या बांधवांनी लक्षात घ्यायला हवं. सध्या, एकाच प्रकारची मदत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या शहरातून येत आहे. तर, ग्रामीण भागातूनही याच प्रकारची मदत येते आहे. गहू, तांदुळ, साखर या किराणा मालाची गरज आहेच, पण सध्या गरज आहे ती आरोग्याकडे लक्ष देण्याची. त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वच्छतापूरक वस्तूंची सध्या गरज असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. 

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे कोल्हापूर आणि सांगतीलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत. या भागातील मतदकार्यावेळी निरीक्षण नोंदविल्यानंतर अविनाश जाधव आणि तानाजी सावंत यांनी मदत करणाऱ्या संस्था आणि दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे. त्यानुसार, मदतीच वर्गीकरणाबाबत त्यांनी मार्गदर्शन आणि आवाहन केलं आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईMNSमनसेthaneठाणेSangliसांगलीKolhapur Floodकोल्हापूर पूर