शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत! पालकमंत्री हारतुऱ्यांत, खासदार फोडाफोडीत, आमदार दिवाळीच्या जल्लोषात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 16:35 IST

पावसामुळे झालेल्या पीकहानीच्या पंचनाम्याचे आदेश निघालेत; पण प्रशासन ‘दिवाळीनंतर बघू’ या भूमिकेत

सांगली : पालकमंत्र्यांची नव्याची नवलाई अजूनही संपलेली नाही. खासदारांना तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणातून फुरसत नाही. आमदार दिवाळीच्या गोडधोडात रमलेत आणि प्रशासन दिवाळी सुट्ट्यांच्या मूडमध्ये आहे. यामध्ये शेतकऱ्याला मात्र कोणीच वाली नसल्याची स्थिती आहे.

पावसामुळे झालेल्या पीकहानीच्या पंचनाम्याचे आदेश निघालेत; पण प्रशासन ‘दिवाळीनंतर बघू’ या भूमिकेत आहे. तासगावमध्ये काही प्रमाणात पंचनामे सुरू झालेत; पण अन्यत्र आनंदी आनंद आहे. पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत कुजलेले पीक शेतातच ठेवणे शेतकऱ्याला शक्य नाही. त्याला रब्बीचा हंगाम साधायचा आहे. त्यामुळे कुजलेली पिके काढून नव्या पेरणीकडे शेतकरी वळले आहेत. पाऊस थांबल्यावर आठ-दहा दिवसांनी प्रशासन कशाचे पंचनामे करणार, असा प्रश्न आहे.

जिल्ह्यात ७० टक्के सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. मका, उडीद, मूग शेतातच कुजले आहे. फडात पाणी उभे राहिल्याने ऊस तोडायचा कसा? अशी समस्या ऊसकरी शेतकऱ्यांपुढे आहे. परतीच्या पावसाने माघार घेतली असली तरी जाता-जाता त्याने घातलेल्या धिंगाण्याचे मोजमाप होईल या भाबड्या आशेत शेतकरी आहेत.

आभार दौरे आणि हारतुऱ्यांतून पालकमंत्र्यांना सवड मिळेना

पालकमंत्रिपदी नियुक्तीपासून सुरेश खाडे यांचे ‘नॉनस्टॉप’ दौरे सुरू आहेत. मिरज मतदारसंघात दररोज चार-पाच गावांत सभा होताहेत. कार्यकर्त्यांनी प्रेमाने घातलेल्या हारतुऱ्यांमध्ये अक्षरश: डुबून गेले आहेत. या गर्दीतून त्यांना नुकसानग्रस्त शेतकरी कधी दिसणार, असा प्रश्न आहे.

खासदार फोडाफोडीत अडकले

खासदार संजयकाका पाटील यांना तासगाव आणि कवठेमहांकाळमधील राजकीय फोडाफोडीचे काम लागले आहे. नगरपंचायतीवर सत्ता आणल्याशिवाय कवठेमहांकाळच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत असे त्यांना वाटत असावे. या व्यापात त्यांना दिल्लीतून केंद्राचे पथक पाहणीसाठी आणायचे असते याचाही विसर पडला आहे.

महसूलच्या संपाचे विघ्न

दिवाळीअगोदरपासून महसूलचे कर्मचारी संपावर आहेत. पंचनाम्यासाठी महत्त्वाचा घटक असलेला तलाठी संपावर असल्याने पंचनामे कसे होणार, असा प्रश्न आहे.

उसात आंतरपीक म्हणून घेतलेले सोयाबीन हाताला लागले नाही. मोठा खर्च करून सोयाबीन आणले; पण सरीमध्ये पाणी साचून राहिले. शेंगामधून कोंब फुटले. पंचनाम्याची वाट पाहतोय. - रमेश जाधव, शेतकरी, येलूर (ता. वाळवा) 

शेतकरी रब्बीच्या कामांत गुंतला असताना आता पंचनामे कशाचे करणार? आदेश येऊनही पंचनामे नाहीत. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारणार आहोत. - महेश खराडे, स्वाभिमानी संघटना

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस