शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत! पालकमंत्री हारतुऱ्यांत, खासदार फोडाफोडीत, आमदार दिवाळीच्या जल्लोषात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 16:35 IST

पावसामुळे झालेल्या पीकहानीच्या पंचनाम्याचे आदेश निघालेत; पण प्रशासन ‘दिवाळीनंतर बघू’ या भूमिकेत

सांगली : पालकमंत्र्यांची नव्याची नवलाई अजूनही संपलेली नाही. खासदारांना तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणातून फुरसत नाही. आमदार दिवाळीच्या गोडधोडात रमलेत आणि प्रशासन दिवाळी सुट्ट्यांच्या मूडमध्ये आहे. यामध्ये शेतकऱ्याला मात्र कोणीच वाली नसल्याची स्थिती आहे.

पावसामुळे झालेल्या पीकहानीच्या पंचनाम्याचे आदेश निघालेत; पण प्रशासन ‘दिवाळीनंतर बघू’ या भूमिकेत आहे. तासगावमध्ये काही प्रमाणात पंचनामे सुरू झालेत; पण अन्यत्र आनंदी आनंद आहे. पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत कुजलेले पीक शेतातच ठेवणे शेतकऱ्याला शक्य नाही. त्याला रब्बीचा हंगाम साधायचा आहे. त्यामुळे कुजलेली पिके काढून नव्या पेरणीकडे शेतकरी वळले आहेत. पाऊस थांबल्यावर आठ-दहा दिवसांनी प्रशासन कशाचे पंचनामे करणार, असा प्रश्न आहे.

जिल्ह्यात ७० टक्के सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. मका, उडीद, मूग शेतातच कुजले आहे. फडात पाणी उभे राहिल्याने ऊस तोडायचा कसा? अशी समस्या ऊसकरी शेतकऱ्यांपुढे आहे. परतीच्या पावसाने माघार घेतली असली तरी जाता-जाता त्याने घातलेल्या धिंगाण्याचे मोजमाप होईल या भाबड्या आशेत शेतकरी आहेत.

आभार दौरे आणि हारतुऱ्यांतून पालकमंत्र्यांना सवड मिळेना

पालकमंत्रिपदी नियुक्तीपासून सुरेश खाडे यांचे ‘नॉनस्टॉप’ दौरे सुरू आहेत. मिरज मतदारसंघात दररोज चार-पाच गावांत सभा होताहेत. कार्यकर्त्यांनी प्रेमाने घातलेल्या हारतुऱ्यांमध्ये अक्षरश: डुबून गेले आहेत. या गर्दीतून त्यांना नुकसानग्रस्त शेतकरी कधी दिसणार, असा प्रश्न आहे.

खासदार फोडाफोडीत अडकले

खासदार संजयकाका पाटील यांना तासगाव आणि कवठेमहांकाळमधील राजकीय फोडाफोडीचे काम लागले आहे. नगरपंचायतीवर सत्ता आणल्याशिवाय कवठेमहांकाळच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत असे त्यांना वाटत असावे. या व्यापात त्यांना दिल्लीतून केंद्राचे पथक पाहणीसाठी आणायचे असते याचाही विसर पडला आहे.

महसूलच्या संपाचे विघ्न

दिवाळीअगोदरपासून महसूलचे कर्मचारी संपावर आहेत. पंचनाम्यासाठी महत्त्वाचा घटक असलेला तलाठी संपावर असल्याने पंचनामे कसे होणार, असा प्रश्न आहे.

उसात आंतरपीक म्हणून घेतलेले सोयाबीन हाताला लागले नाही. मोठा खर्च करून सोयाबीन आणले; पण सरीमध्ये पाणी साचून राहिले. शेंगामधून कोंब फुटले. पंचनाम्याची वाट पाहतोय. - रमेश जाधव, शेतकरी, येलूर (ता. वाळवा) 

शेतकरी रब्बीच्या कामांत गुंतला असताना आता पंचनामे कशाचे करणार? आदेश येऊनही पंचनामे नाहीत. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारणार आहोत. - महेश खराडे, स्वाभिमानी संघटना

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस