शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

वारणा पात्राबाहेर, कृष्णा इशारा पातळीकडे; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:23 IST

२७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले

सांगली : धरण क्षेत्रात मुसळधार, तर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण ७४.३८ टक्के भरल्यामुळे धरणातून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता २१ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, सांगली आर्यविन पूल येथे पातळी ३४ फुटांवर गेली आहे. वारण धरण ८८ टक्के भरल्यामुळे तेथूनही १० हजार ४६० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर, तर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. नदीकाठची कुटुंबे, पशुधनाचे स्थलांतर सुरू आहे.जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या सहा दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळ्यात चोवीस तासांत ५०.१ मिलिमीटर, तर चरण परिसरात १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या ठिकाणी ढगफुटीसदृश असाच पाऊस झाला आहे. वाळवा, मिरज, पलूससह दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातही संततधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्या, ओढ्यासह नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे २७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले आहेत.वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून, कुटुंबीयांनी तेथून पशुधन हलविले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी गुरुवारी दिवसभरात अडीच फुटांनी वाढून सायंकाळी सांगली आर्यविन पूल येथे ३३ फुटांवर गेली आहे. सांगली, मिरज शहरांतील उपनगरांमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. या परिसरातील १८६ लोकांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे.जिल्ह्यात २०.५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे - मिरज १५.४ (३८४.३), जत ४.७ (२६७.२), खानापूर १९.८ (३१८.१), वाळवा २७.५ (५९०.६), तासगाव १९ (३८३.८), शिराळा ५०.१ (८४७.३), आटपाडी ९ (२४०.४), कवठेमहांकाळ ७.३ (३६०.७), पलूस २४ (४१२.२), कडेगाव २६.१ (४०९.२).

जिल्ह्यातील पाणीपातळीपाणी पातळी - फूट इंचामध्येकृष्णा पूल कऱ्हाड २३.०३बहे पूल ११.०९ताकारी पूल ३७भिलवडी पूल ३५.०६आयर्विन ३३राजापूर बंधारा ४६.०३राजाराम बंधारा ४३.०४

११० नागरिक, ७६३ पशुधनाचे स्थलांतरवारणा नदीपात्रात पाणी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा तालुक्यातील भरतवाडी, कणेगाव व शिराळ्यातील देववाडी, चिकुर्डे या गावांतील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शिराळा तालुक्यातील ५७ ग्रामस्थांचे आणि ६७७ जनावरांचे, तर वाळवा तालुक्यातील ५३ ग्रामस्थ आणि ८३ जनावरे अशा ११० ग्रामस्थांचे आणि ७६३ जनावरांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील १०४ गावांना पुराचा धोका असल्यामुळे प्रशासन त्याठिकाणी अलर्ट आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी