शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

वारणा पात्राबाहेर, कृष्णा इशारा पातळीकडे; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:23 IST

२७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले

सांगली : धरण क्षेत्रात मुसळधार, तर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण ७४.३८ टक्के भरल्यामुळे धरणातून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता २१ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, सांगली आर्यविन पूल येथे पातळी ३४ फुटांवर गेली आहे. वारण धरण ८८ टक्के भरल्यामुळे तेथूनही १० हजार ४६० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर, तर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. नदीकाठची कुटुंबे, पशुधनाचे स्थलांतर सुरू आहे.जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या सहा दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळ्यात चोवीस तासांत ५०.१ मिलिमीटर, तर चरण परिसरात १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या ठिकाणी ढगफुटीसदृश असाच पाऊस झाला आहे. वाळवा, मिरज, पलूससह दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातही संततधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्या, ओढ्यासह नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे २७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले आहेत.वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून, कुटुंबीयांनी तेथून पशुधन हलविले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी गुरुवारी दिवसभरात अडीच फुटांनी वाढून सायंकाळी सांगली आर्यविन पूल येथे ३३ फुटांवर गेली आहे. सांगली, मिरज शहरांतील उपनगरांमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. या परिसरातील १८६ लोकांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे.जिल्ह्यात २०.५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे - मिरज १५.४ (३८४.३), जत ४.७ (२६७.२), खानापूर १९.८ (३१८.१), वाळवा २७.५ (५९०.६), तासगाव १९ (३८३.८), शिराळा ५०.१ (८४७.३), आटपाडी ९ (२४०.४), कवठेमहांकाळ ७.३ (३६०.७), पलूस २४ (४१२.२), कडेगाव २६.१ (४०९.२).

जिल्ह्यातील पाणीपातळीपाणी पातळी - फूट इंचामध्येकृष्णा पूल कऱ्हाड २३.०३बहे पूल ११.०९ताकारी पूल ३७भिलवडी पूल ३५.०६आयर्विन ३३राजापूर बंधारा ४६.०३राजाराम बंधारा ४३.०४

११० नागरिक, ७६३ पशुधनाचे स्थलांतरवारणा नदीपात्रात पाणी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा तालुक्यातील भरतवाडी, कणेगाव व शिराळ्यातील देववाडी, चिकुर्डे या गावांतील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शिराळा तालुक्यातील ५७ ग्रामस्थांचे आणि ६७७ जनावरांचे, तर वाळवा तालुक्यातील ५३ ग्रामस्थ आणि ८३ जनावरे अशा ११० ग्रामस्थांचे आणि ७६३ जनावरांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील १०४ गावांना पुराचा धोका असल्यामुळे प्रशासन त्याठिकाणी अलर्ट आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी