शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

वारणा पात्राबाहेर, कृष्णा इशारा पातळीकडे; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:23 IST

२७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले

सांगली : धरण क्षेत्रात मुसळधार, तर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण ७४.३८ टक्के भरल्यामुळे धरणातून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता २१ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, सांगली आर्यविन पूल येथे पातळी ३४ फुटांवर गेली आहे. वारण धरण ८८ टक्के भरल्यामुळे तेथूनही १० हजार ४६० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर, तर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. नदीकाठची कुटुंबे, पशुधनाचे स्थलांतर सुरू आहे.जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या सहा दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळ्यात चोवीस तासांत ५०.१ मिलिमीटर, तर चरण परिसरात १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या ठिकाणी ढगफुटीसदृश असाच पाऊस झाला आहे. वाळवा, मिरज, पलूससह दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातही संततधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्या, ओढ्यासह नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे २७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले आहेत.वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून, कुटुंबीयांनी तेथून पशुधन हलविले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी गुरुवारी दिवसभरात अडीच फुटांनी वाढून सायंकाळी सांगली आर्यविन पूल येथे ३३ फुटांवर गेली आहे. सांगली, मिरज शहरांतील उपनगरांमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. या परिसरातील १८६ लोकांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे.जिल्ह्यात २०.५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे - मिरज १५.४ (३८४.३), जत ४.७ (२६७.२), खानापूर १९.८ (३१८.१), वाळवा २७.५ (५९०.६), तासगाव १९ (३८३.८), शिराळा ५०.१ (८४७.३), आटपाडी ९ (२४०.४), कवठेमहांकाळ ७.३ (३६०.७), पलूस २४ (४१२.२), कडेगाव २६.१ (४०९.२).

जिल्ह्यातील पाणीपातळीपाणी पातळी - फूट इंचामध्येकृष्णा पूल कऱ्हाड २३.०३बहे पूल ११.०९ताकारी पूल ३७भिलवडी पूल ३५.०६आयर्विन ३३राजापूर बंधारा ४६.०३राजाराम बंधारा ४३.०४

११० नागरिक, ७६३ पशुधनाचे स्थलांतरवारणा नदीपात्रात पाणी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा तालुक्यातील भरतवाडी, कणेगाव व शिराळ्यातील देववाडी, चिकुर्डे या गावांतील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शिराळा तालुक्यातील ५७ ग्रामस्थांचे आणि ६७७ जनावरांचे, तर वाळवा तालुक्यातील ५३ ग्रामस्थ आणि ८३ जनावरे अशा ११० ग्रामस्थांचे आणि ७६३ जनावरांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील १०४ गावांना पुराचा धोका असल्यामुळे प्रशासन त्याठिकाणी अलर्ट आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी