शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

६९९ गावांपैकी तीन गावांमध्येच मीटरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:17 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस , कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी २५ हजार ७७ कुटुंबांकडेच पाणी कनेक्शन्स असून उर्वरित कुटुंबे घेत असलेल्या पाण्याचा हिशेबच होत नाही.जिल्ह्यात ३७ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची तहान भागविली जात आहे. यापैकी १७ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद चालवित असून सध्या ११ योजना केवळ वीज बिल थकीत असल्यामुळे बंद आहेत. त्याला पूरक सावळज (ता. तासगाव) योजना २०१४, तर आरग-बेडग, बेळंकी (ता. मिरज) योजना २००७ पासून बंद आहे. येळावी (ता. तासगाव), रायगाव (ता. कडेगाव), वाघोली (ता. कवठेमहांकाळ), नांद्रे-वसगडे (ता. पलूस), मणेराजुरी-कवठेमहांकाळ-विसापूर या पाच योजनांचा वीजपुरवठा मार्चपासून खंडित असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती चालू आहे. पेड (ता. तासगाव) ही योजना आॅगस्ट २०१६ पासून तलावात पाणी नसल्याने बंद आहे. यापैकी बहुतांशी प्रादेशिक योजना ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांच्या पाईपलाईनला गळती आहे. जलशुध्दीकरणासह पंपिंग यंत्रसामग्री कालबाह्य झाल्यामुळे तीही बदलण्याची गरज आहे. या योजना दुरुस्तीसाठी जवळपास शंभर ते सव्वाशे कोटींच्या निधीची गरज आहे.याशिवाय, १९ पाणी पुरवठा योजना शिखर समिती आणि ग्रामपंचायती चालवत आहेत. यापैकीही किल्लेमच्छिंद्रगड, बहे (ता. वाळवा), माधवनगर (ता. मिरज), सावळज (ता. तासगाव), पणुंब्रेतर्फ वारुण, रिळे, कांदे, येळापूर (ता. शिराळा), नेर्ली, नेवरी (ता. कडेगाव) येथील पाणी पुरवठा योजना तीन ते चार वर्षापासून बंद आहेत. कोणतीही तांत्रिक वस्तुस्थिती जाणून न घेता राजकीय दबावामुळे स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिल्यामुळे कोट्यवधीच्या योजना सध्या बंद पडल्या आहेत. याला राजकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत. पूर्वी चार ते दहा गावांसाठी एक योजना केली होती. यामधून अनेक गावे बाहेर पडल्यामुळे मोठ्या योजनांचा बोजा छोट्या गावांवर पडल्यामुळे त्यांच्या खिशाला योजनेचे पाणी परवडत नसल्याचे दिसत आहे.योजना केल्यानंतर कुटुंबांना पाणी कनेक्शन घेण्याची सवयच लावली नसल्यामुळे पाण्याचा बेकायदेशीर वापर वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात १२ प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ८८ गावांमध्ये ५८ हजार २८५ कुटुंब संख्या असताना, केवळ २५ हजार ७७ नळ जोडण्या आहेत. ३३ हजार २०८ कुटुंबियांकडे पाणी कनेक्शनच नाहीत. सार्वजनिक नळातूनच पाण्याचा वापर होत आहे. याहीपेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे, जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ वाळवा तालुक्यातील बिचूद, येडेनिपाणी व मिरज तालुक्यातील हरिपूर या गावामध्येच नागरिकांना मीटरने मोजून पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा लेखाजोखा...योजनेचे नाव गावे कुटुंबे नळ जोडण्या थकीत पाणीपट्टी सद्यस्थितीकासेगाव मूळ ७ ६४१७ ३००० ३५१४७९२८ नूतनीकरण सुरुकासेगाव नवीन ७ ३८६९ १९९९ नूतनीकरण सुरुनवेखेड-जुनेखेड २ १०४१ ७८९ ३७७१२९४ योजना सुरळीत सुरुतुंग-बागणी ४ १४१२ ११४५ ४८१३७४७ दुरुस्तीची गरजवाघोली ३ ३८३ १०३ ५८८१९९ योजना बंदनांद्रे-वसगडे ५ १५४० ११५१ १५१८०४५६ दुरुस्तीची गरजमणेराजुरी/कवठेमहांकाळ/ ३१ २१०८७ ६३३८ २१५४३१२१ योजना बंदविसापूरपेड ५ ३६८३ १३६१ ४६०२३७९ योजना बंदयेळावी ९ ४७२० १२३७ २६८८९९५ योजना बंदकुंडल १४ ३९४७ ७८८७ २८२२०९६२ दुरुस्तीची गरजएकूण ८८ ५८२८५ २५०७७ ११७०५१४९०