शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आमचे सरकार दिल्लीपुढे नाही झुकणार; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:23 IST

एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : चार महिन्यांपूर्वी युतीत होतो. शिवसेनेची सोबत होती, म्हणूनच केंद्रात भाजपचे सरकार आले. केंद्राचे सरकार देशाचे पालक असते. महापुरासह अस्मानी संकटाने प्रचंड नुकसान झाले. अशावेळी पालक म्हणून मदत करण्याऐवजी ते त्याला नकार देत आहेत. मात्र आम्ही पडेल ती किंमत मोजून शेतकºयाला मदत करू. यासाठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

इस्लामपूर येथील महसूल विभागाच्या नूतन तहसील कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

ठाकरे म्हणाले की, एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे. आता दोन लाखांवरील कर्ज आणि नियमित शेतीकर्ज फेडणाºया शेतकºयांनाही दिलासा देणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेल्याचे अर्थतज्ज्ञ सांगतात. ती कोणामुळे गेली हे सर्वांना माहीत आहे. आता तिला बाहेर काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांचे जाळे विस्तारायला हवे. देशातील सर्वात मोठे उद्योगपती महाराष्ट्रातील मुंबईत राहतात. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले , राजारामबापूंच्या पुण्यतिथीदिनी विधायक कामे सुरू करण्याची आमची परंपरा आहे. भविष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा भविष्य घडविणारी आमची पिढी या तालुक्यात निर्माण झाली आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी इमारत तयार होऊनही तिचा वापर होत नव्हता. त्यामुळे कोणाच्याहस्ते उद्घाटन करून घ्यायचे, हे इमारतीनेच ठरवले होते. त्याला मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे हात लागले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे