शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आमचे सरकार दिल्लीपुढे नाही झुकणार; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:23 IST

एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : चार महिन्यांपूर्वी युतीत होतो. शिवसेनेची सोबत होती, म्हणूनच केंद्रात भाजपचे सरकार आले. केंद्राचे सरकार देशाचे पालक असते. महापुरासह अस्मानी संकटाने प्रचंड नुकसान झाले. अशावेळी पालक म्हणून मदत करण्याऐवजी ते त्याला नकार देत आहेत. मात्र आम्ही पडेल ती किंमत मोजून शेतकºयाला मदत करू. यासाठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

इस्लामपूर येथील महसूल विभागाच्या नूतन तहसील कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

ठाकरे म्हणाले की, एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे. आता दोन लाखांवरील कर्ज आणि नियमित शेतीकर्ज फेडणाºया शेतकºयांनाही दिलासा देणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेल्याचे अर्थतज्ज्ञ सांगतात. ती कोणामुळे गेली हे सर्वांना माहीत आहे. आता तिला बाहेर काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांचे जाळे विस्तारायला हवे. देशातील सर्वात मोठे उद्योगपती महाराष्ट्रातील मुंबईत राहतात. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले , राजारामबापूंच्या पुण्यतिथीदिनी विधायक कामे सुरू करण्याची आमची परंपरा आहे. भविष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा भविष्य घडविणारी आमची पिढी या तालुक्यात निर्माण झाली आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी इमारत तयार होऊनही तिचा वापर होत नव्हता. त्यामुळे कोणाच्याहस्ते उद्घाटन करून घ्यायचे, हे इमारतीनेच ठरवले होते. त्याला मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे हात लागले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे