शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आमचे सरकार दिल्लीपुढे नाही झुकणार; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:23 IST

एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : चार महिन्यांपूर्वी युतीत होतो. शिवसेनेची सोबत होती, म्हणूनच केंद्रात भाजपचे सरकार आले. केंद्राचे सरकार देशाचे पालक असते. महापुरासह अस्मानी संकटाने प्रचंड नुकसान झाले. अशावेळी पालक म्हणून मदत करण्याऐवजी ते त्याला नकार देत आहेत. मात्र आम्ही पडेल ती किंमत मोजून शेतकºयाला मदत करू. यासाठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

इस्लामपूर येथील महसूल विभागाच्या नूतन तहसील कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

ठाकरे म्हणाले की, एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे. आता दोन लाखांवरील कर्ज आणि नियमित शेतीकर्ज फेडणाºया शेतकºयांनाही दिलासा देणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेल्याचे अर्थतज्ज्ञ सांगतात. ती कोणामुळे गेली हे सर्वांना माहीत आहे. आता तिला बाहेर काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांचे जाळे विस्तारायला हवे. देशातील सर्वात मोठे उद्योगपती महाराष्ट्रातील मुंबईत राहतात. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले , राजारामबापूंच्या पुण्यतिथीदिनी विधायक कामे सुरू करण्याची आमची परंपरा आहे. भविष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा भविष्य घडविणारी आमची पिढी या तालुक्यात निर्माण झाली आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी इमारत तयार होऊनही तिचा वापर होत नव्हता. त्यामुळे कोणाच्याहस्ते उद्घाटन करून घ्यायचे, हे इमारतीनेच ठरवले होते. त्याला मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे हात लागले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे