शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्के पेरणी, खरीप हंगामाबद्दल शेतकऱ्यांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:21 IST

शेतकरी मोठ्या पावसाकडे नजर लावून बसले आहेत.

सांगली : जुलैचा तिसरा आठवडा आला तरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४० टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाचा परिणाम थेट खरीप पेरणीवर होऊ लागला आहे. आतापर्यंत अवघ्या ६७ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. तब्बल ९३ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजर लावून बसले आहेत.जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ८४ हजार ४१० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी एक लाख ९१ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. केवळ ६७ टक्के पेरणी झाली आहे. जुलै महिना संपत आला असतानाही ९३ हजार ७८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणीच झाली नाही. सोयाबीनचे सरासरी ४६ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र असून, ३७ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती ८१ टक्के आहे. मूग, उडीद, मटकी, तूर आदी कडधान्यांची पेरणी ७६ टक्के झाली आहे. भात १६ हजार ६४ हेक्टर क्षेत्र असून, ८८ टक्के पेरणी झाली आहे.प्रथमच १२ टक्के क्षेत्रात पेरणीच झालेली नाही. खरीप ज्वारीची २३ टक्के, तर बाजरीची ७३ टक्के पेरणी झाली आहे. पावसाचा जोर नसल्यामुळे उर्वरित क्षेत्रावर पेरणी होणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहे.

तालुकानिहाय पेरणीतालुका - पेरणी टक्केवारीमिरज ६५.९जत १०३.३खानापूर १६.२वाळवा ७४.३आटपाडी २०.८पलूस ८४.६कडेगाव ४४.३शिराळा ८४.००तासगाव ५२.०७कवठेमहांकाळ ७२.४एकूण ६७.३जिल्ह्यात १८ जुलैपर्यंत तीन वर्षांचा पाऊस (मिलीमीटरमध्ये)तालुका - २०२२ - २०२१ - २०१९वाळवा - १६८.४ - २६८.८ - १७१पलूस - १४७.१ - २७०.९  - ८३तासगाव - १०७.८ - २९२१ - २०४शिराळा - ४२८.७ - २८२.२ - ३७३मिरज - १४३.३ - २५९.७ - १७१खानापूर - १२६.९ - १२८.३ - १२२आटपाडी - ६९.४ - १३९.८ - ९३क.महांकाळ - १८२.१ - १९२.२ - ११०जत  - १०८.८ - २७०.८ - १२४कडेगाव - १७९.२ - १९६.७ - २०१

पाऊस कमी झाल्यामुळे खरीप पेरणी कमी झाली आहे. पण, सध्या पाऊस सुरू झाल्यामुळे पेरण्यांना या आठवड्यात गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. बियाणे, रासायनिक खताचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. -प्रकाश सूर्यवंशी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी