शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ; महापुराची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 14:30 IST

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने दिलासा

सांगली : सांगली, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. नद्यां-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सांगलीसह कोल्हापूरला पूरस्थिती गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु होता. आज, बुधवारी सकाळी १० वाजता अलमट्टी धरण प्रशासनाने तो वाढवत आता दीड लाखावर नेला आहे. याबाबतचा अॅलर्ट त्यांनी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास दिला आहे.कृष्णेची पाणीपातळी नऊ फुटाने वाढलीशिराळा तालुक्यासह कोयना, वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यात ७० मिलिमीटर, तर वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात १३० आणि कोयना धरण क्षेत्रात १७५ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले असून कृष्णा दुथडी भरून वाहत आहे.काल, मंगळवारी दिवसभरात वारणा धरण क्षेत्रात ३७, तर कोयना धरण क्षेत्रात ९२ मिलिमीटर पाऊस झाला. वारणा धरणात ३०.५३ टीएमसी पाणीसाठा असून ८९ टक्के धरण भरले आहे. यामुळे धरणातून पाच हजार ६२८ क्युसेकने विसर्ग होत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरण ७२ टक्के भरले आहे.

दोन लाख क्युसेकने विसर्ग सोडासांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. कोयना, वारणा, राधानगरी धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. यामुळे अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेकने सध्या विसर्ग केला तरच कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचा महापूर टाळता येणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वारणा नदीकाठी महापुराची धास्तीसंततधार पावसामुळे वारणा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरले असून वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील नदीकाठावरील लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने देण्यात आलेल्या आहेत.गतवर्षी २३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधित वारणा नदीला महापूर आला होता.  गतवर्षीच्या महापुरातून अद्याप अनेकजण सावरलेले नसताना आता पुन्हा  वारणेला पूर आल्याने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने वारणा नदीला पूर आलेला आहे. मांगले, चिकुर्डे, कुंडलवाडीदरम्यान असणारे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी शेतीमध्ये शिरले आहे.चिकुर्डेत पुलावर पाणीवाळवा तालुक्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच चांदाेली धरणातून पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने चिकुर्डे परिसरात वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. चिकुर्डे ते वारणानगर जुना पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरण