शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

Sangli: 'शक्तिपीठ' नको म्हणून हरकत घेतली, सुनावणी कधी घेणार?, बारा गावातील शेतकऱ्यांचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल

By अशोक डोंबाळे | Updated: February 27, 2025 17:58 IST

१९ गावांमध्ये उद्या काळा दिवस पाळणार, २३ मार्चला शेतकरी रस्त्यावर उतरणार

सांगली : हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, म्हणून आम्ही हरकत घेतली आहे. या हरकतीवर सुनावणी कधी घेणार आहे, असा सवाल मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, सक्तीच्या भूसंपादनाचा दि. २८ फेब्रुवारीला १९ गावांमध्ये शेतकरी काळ दिवस पाळणार असून, घरावर काळ्या गुड्या उभारणार आहे, असेही शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले.दिगंबर कांबळे म्हणाले, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गला सांगली जिल्ह्यातील १९ गावातून तीव्र विरोध आहे. द्राक्ष, डाळिंब, ऊस मोठ्या प्रमाणात बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. तसेच हा महामार्ग नदीकाठावरील गावातून जात असल्याने प्रचंड पुराचा धोका वाढणार आहे. अनेक गावांना स्थलांतर होण्याचा धोका निर्माण होणार आहे. कुणाचीही मागणी नसलेला हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन, बेरोजगार करणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा एकाही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग कुणासाठी केला जातोय, हे सरकारने जाहीर करावे.शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनाने तातडीने सुनावणी घेण्याचीही त्यांनी मागणी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे. शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या २०१३ भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी आहे.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, गजानन पाटील, विष्णू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जमदाडे, सुभाष जमदाडे, शिवाजी शिंदे, प्रकाश टकले, पांडुरंग पवळ, रमेश कांबळे व इतर शेतकरी उपस्थित होते.

२३ मार्चला शेतकरी रस्त्यावर उतरणारराज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दबाबतचे शासकीय परिपत्रक २३ मार्चपूर्वी काढले पाहिजे. शासनाने २३ मार्चपर्यंत काहीच निर्णय घेतला नाही तर शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीnagpurनागपूरgoaगोवाhighwayमहामार्गFarmerशेतकरी