शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

Sangli: 'शक्तिपीठ' नको म्हणून हरकत घेतली, सुनावणी कधी घेणार?, बारा गावातील शेतकऱ्यांचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल

By अशोक डोंबाळे | Updated: February 27, 2025 17:58 IST

१९ गावांमध्ये उद्या काळा दिवस पाळणार, २३ मार्चला शेतकरी रस्त्यावर उतरणार

सांगली : हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, म्हणून आम्ही हरकत घेतली आहे. या हरकतीवर सुनावणी कधी घेणार आहे, असा सवाल मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, सक्तीच्या भूसंपादनाचा दि. २८ फेब्रुवारीला १९ गावांमध्ये शेतकरी काळ दिवस पाळणार असून, घरावर काळ्या गुड्या उभारणार आहे, असेही शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले.दिगंबर कांबळे म्हणाले, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गला सांगली जिल्ह्यातील १९ गावातून तीव्र विरोध आहे. द्राक्ष, डाळिंब, ऊस मोठ्या प्रमाणात बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. तसेच हा महामार्ग नदीकाठावरील गावातून जात असल्याने प्रचंड पुराचा धोका वाढणार आहे. अनेक गावांना स्थलांतर होण्याचा धोका निर्माण होणार आहे. कुणाचीही मागणी नसलेला हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन, बेरोजगार करणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा एकाही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग कुणासाठी केला जातोय, हे सरकारने जाहीर करावे.शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनाने तातडीने सुनावणी घेण्याचीही त्यांनी मागणी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे. शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या २०१३ भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी आहे.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, गजानन पाटील, विष्णू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जमदाडे, सुभाष जमदाडे, शिवाजी शिंदे, प्रकाश टकले, पांडुरंग पवळ, रमेश कांबळे व इतर शेतकरी उपस्थित होते.

२३ मार्चला शेतकरी रस्त्यावर उतरणारराज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दबाबतचे शासकीय परिपत्रक २३ मार्चपूर्वी काढले पाहिजे. शासनाने २३ मार्चपर्यंत काहीच निर्णय घेतला नाही तर शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीnagpurनागपूरgoaगोवाhighwayमहामार्गFarmerशेतकरी