शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
4
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
5
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
6
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
7
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
8
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
9
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
10
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
11
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
12
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
14
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
15
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
16
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
17
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
18
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
19
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
20
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!

तेरा दुष्काळी तालुक्यांतील कामे पूर्ण होण्यासाठी आता संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST

महेंद्र किणीकर लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : नागनाथअण्णा आटपाडीला आले नसते तर तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले नसते. कोणाच्या ...

महेंद्र किणीकर

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : नागनाथअण्णा आटपाडीला आले नसते तर तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले नसते. कोणाच्या तरी पत्राने किंवा दौऱ्यांमुळे पाणी आलेले नाही, दोन पिढ्यांना खस्ता खाव्या लागल्या आहेत. आता अपू्र्ण कामांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन आटपाडी पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.

शनिवारी आयोजित ऑनलाईन परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सांगोला, मंगळवेढ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. काही गावे अद्याप वंचित आहेत. जनतेच्या ताकदीपुढे शासनाला नमावेच लागेल, कामे पूर्ण करावी लागतील. २९ वर्षांपूर्वी कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात आणायचे हे स्वप्न होते. हुतात्मा कारखान्याने सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जागृत व संघटित केले. शासनाला धडकी भरवणारी आंदोलने केली, त्यामुळेच पाणी खळाळू लागले आहे.

ते म्हणाले, पाण्यापासून वंचित असणाऱ्या उर्वरित भागासाठी आता संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय नागनाथअण्णांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी अखंड लढ्याशिवाय पर्याय नाही. १५ जुलैपासून अण्णांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होताहेत. १३ दुष्काळी तालुक्यांतही अनेक कार्यक्रम होतील.

प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, दुष्काळी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील कामांचा आढावा वैभव नायकवडी व गणपतराव देशमुख यांना पाठवावा. त्यानंतर अपूर्ण कामांच्या पूर्णतेसाठी पाठपुरावा करता येईल.

यावेळी प्राचार्य आर. एस. चोपडे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, लोणंदचे सर्फराज बागवान, शेटफळेचे चंद्रकांत गायकवाड, ॲड. सुभाष पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. दादासाहेब ढेरे यांनीही मार्गदर्शन केले.

चौकट

विरोधक नारळ फोडत सुटलेत

माजी आमदार गणपतराव देशमुख प्रकृती अस्वास्थ्यामुळे परिषदेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख म्हणाले, पाणी मंगळवेढ्यात पोहोचले आहे, सर्वत्र पोहोचण्यासाठी लढा द्यावा लागेल. या योजनेतील शुक्राचार्य आता नारळ फोडत पाणी आम्हीच आणल्याचे सांगत सुटले आहेत.

चौकट

‘टेंभू’ला नागनाथअण्णांचे नाव द्या

दुष्काळी भागात पाणी म्हणजे राजकारण असल्याचा संभ्रम दुष्काळी भागात होता. तो फोल ठरून आज सर्वत्र पाणी पोहोचले आहे. नागनाथ अण्णांचीची चळवळ विस्मरणात जाऊ नये, म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात टेंभू योजनेला अण्णांचे नाव देण्याची मागणी परिषदेत झाली.