शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेरा दुष्काळी तालुक्यांतील कामे पूर्ण होण्यासाठी आता संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST

महेंद्र किणीकर लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : नागनाथअण्णा आटपाडीला आले नसते तर तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले नसते. कोणाच्या ...

महेंद्र किणीकर

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : नागनाथअण्णा आटपाडीला आले नसते तर तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले नसते. कोणाच्या तरी पत्राने किंवा दौऱ्यांमुळे पाणी आलेले नाही, दोन पिढ्यांना खस्ता खाव्या लागल्या आहेत. आता अपू्र्ण कामांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन आटपाडी पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.

शनिवारी आयोजित ऑनलाईन परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सांगोला, मंगळवेढ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. काही गावे अद्याप वंचित आहेत. जनतेच्या ताकदीपुढे शासनाला नमावेच लागेल, कामे पूर्ण करावी लागतील. २९ वर्षांपूर्वी कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात आणायचे हे स्वप्न होते. हुतात्मा कारखान्याने सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जागृत व संघटित केले. शासनाला धडकी भरवणारी आंदोलने केली, त्यामुळेच पाणी खळाळू लागले आहे.

ते म्हणाले, पाण्यापासून वंचित असणाऱ्या उर्वरित भागासाठी आता संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय नागनाथअण्णांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी अखंड लढ्याशिवाय पर्याय नाही. १५ जुलैपासून अण्णांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होताहेत. १३ दुष्काळी तालुक्यांतही अनेक कार्यक्रम होतील.

प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, दुष्काळी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील कामांचा आढावा वैभव नायकवडी व गणपतराव देशमुख यांना पाठवावा. त्यानंतर अपूर्ण कामांच्या पूर्णतेसाठी पाठपुरावा करता येईल.

यावेळी प्राचार्य आर. एस. चोपडे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, लोणंदचे सर्फराज बागवान, शेटफळेचे चंद्रकांत गायकवाड, ॲड. सुभाष पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. दादासाहेब ढेरे यांनीही मार्गदर्शन केले.

चौकट

विरोधक नारळ फोडत सुटलेत

माजी आमदार गणपतराव देशमुख प्रकृती अस्वास्थ्यामुळे परिषदेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख म्हणाले, पाणी मंगळवेढ्यात पोहोचले आहे, सर्वत्र पोहोचण्यासाठी लढा द्यावा लागेल. या योजनेतील शुक्राचार्य आता नारळ फोडत पाणी आम्हीच आणल्याचे सांगत सुटले आहेत.

चौकट

‘टेंभू’ला नागनाथअण्णांचे नाव द्या

दुष्काळी भागात पाणी म्हणजे राजकारण असल्याचा संभ्रम दुष्काळी भागात होता. तो फोल ठरून आज सर्वत्र पाणी पोहोचले आहे. नागनाथ अण्णांचीची चळवळ विस्मरणात जाऊ नये, म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात टेंभू योजनेला अण्णांचे नाव देण्याची मागणी परिषदेत झाली.