शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

Anil Babar:..म्हणून बंडखोरांच्या गटात; आमदार अनिल बाबर यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:12 IST

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

विटा : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षांत घुसमट होत होती. महाविकास आघाडी सरकार असतानाही विद्यमान लोकप्रतिनिधींना मित्रपक्षांकडून त्रास दिला जात होता. पण, माझे बंड नेतृत्वाविरुद्ध किंवा पक्षाविरोधी अजिबात नाही. माझे बंड शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळावे आणि ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली.

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, अडीच वर्षांत भरपूर त्रास सहन केला. विद्यमान आमदारांचे काही ऐकायचेच नाही, असे ठरवल्यासारखे राजकारण खानापूर मतदार संघात सुरू होते. सत्तेत असलो, नसलो तरी टेंभू योजनेच्या मांडणीपासून आजअखेर गेले दोन ते अडीच तप तत्कालीन सत्तेशी संघर्ष केला. कधी नियोजनाचा अभाव, कधी अनुशेषामुळे निधी मिळण्यात अडचण, कधी तांत्रिक बाबींमुळे योजनेत करावे लागणारे बदल, यामुळे संघर्ष केला. २०१४ ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनीही, आपल्याला मंत्रीपद देऊ, असे मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळीच आपल्याला मंत्रीपदापेक्षा टेंभू योजनेची पूर्तता करणे, हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, असे स्पष्ट केले होते.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याबद्दल प्रयत्न केला. तो टप्पा मंजूर झाला. मात्र, मित्रपक्ष असणाऱ्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याच्या मंजुरीचे फलक लावून, फटाके वाजवून, पेढे वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेणार, यापुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, असाही प्रचार त्या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांकडून जाहीरपणे सुरू होता. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. पण त्यांची म्हणावीशी दखल घेतली गेली नाही, असे बाबर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ