शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Anil Babar:..म्हणून बंडखोरांच्या गटात; आमदार अनिल बाबर यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:12 IST

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

विटा : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षांत घुसमट होत होती. महाविकास आघाडी सरकार असतानाही विद्यमान लोकप्रतिनिधींना मित्रपक्षांकडून त्रास दिला जात होता. पण, माझे बंड नेतृत्वाविरुद्ध किंवा पक्षाविरोधी अजिबात नाही. माझे बंड शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळावे आणि ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली.

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, अडीच वर्षांत भरपूर त्रास सहन केला. विद्यमान आमदारांचे काही ऐकायचेच नाही, असे ठरवल्यासारखे राजकारण खानापूर मतदार संघात सुरू होते. सत्तेत असलो, नसलो तरी टेंभू योजनेच्या मांडणीपासून आजअखेर गेले दोन ते अडीच तप तत्कालीन सत्तेशी संघर्ष केला. कधी नियोजनाचा अभाव, कधी अनुशेषामुळे निधी मिळण्यात अडचण, कधी तांत्रिक बाबींमुळे योजनेत करावे लागणारे बदल, यामुळे संघर्ष केला. २०१४ ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनीही, आपल्याला मंत्रीपद देऊ, असे मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळीच आपल्याला मंत्रीपदापेक्षा टेंभू योजनेची पूर्तता करणे, हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, असे स्पष्ट केले होते.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याबद्दल प्रयत्न केला. तो टप्पा मंजूर झाला. मात्र, मित्रपक्ष असणाऱ्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याच्या मंजुरीचे फलक लावून, फटाके वाजवून, पेढे वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेणार, यापुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, असाही प्रचार त्या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांकडून जाहीरपणे सुरू होता. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. पण त्यांची म्हणावीशी दखल घेतली गेली नाही, असे बाबर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ