शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Anil Babar:..म्हणून बंडखोरांच्या गटात; आमदार अनिल बाबर यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:12 IST

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

विटा : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षांत घुसमट होत होती. महाविकास आघाडी सरकार असतानाही विद्यमान लोकप्रतिनिधींना मित्रपक्षांकडून त्रास दिला जात होता. पण, माझे बंड नेतृत्वाविरुद्ध किंवा पक्षाविरोधी अजिबात नाही. माझे बंड शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळावे आणि ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली.

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, अडीच वर्षांत भरपूर त्रास सहन केला. विद्यमान आमदारांचे काही ऐकायचेच नाही, असे ठरवल्यासारखे राजकारण खानापूर मतदार संघात सुरू होते. सत्तेत असलो, नसलो तरी टेंभू योजनेच्या मांडणीपासून आजअखेर गेले दोन ते अडीच तप तत्कालीन सत्तेशी संघर्ष केला. कधी नियोजनाचा अभाव, कधी अनुशेषामुळे निधी मिळण्यात अडचण, कधी तांत्रिक बाबींमुळे योजनेत करावे लागणारे बदल, यामुळे संघर्ष केला. २०१४ ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनीही, आपल्याला मंत्रीपद देऊ, असे मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळीच आपल्याला मंत्रीपदापेक्षा टेंभू योजनेची पूर्तता करणे, हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, असे स्पष्ट केले होते.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याबद्दल प्रयत्न केला. तो टप्पा मंजूर झाला. मात्र, मित्रपक्ष असणाऱ्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याच्या मंजुरीचे फलक लावून, फटाके वाजवून, पेढे वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेणार, यापुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, असाही प्रचार त्या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांकडून जाहीरपणे सुरू होता. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. पण त्यांची म्हणावीशी दखल घेतली गेली नाही, असे बाबर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ