शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Anil Babar:..म्हणून बंडखोरांच्या गटात; आमदार अनिल बाबर यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:12 IST

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

विटा : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षांत घुसमट होत होती. महाविकास आघाडी सरकार असतानाही विद्यमान लोकप्रतिनिधींना मित्रपक्षांकडून त्रास दिला जात होता. पण, माझे बंड नेतृत्वाविरुद्ध किंवा पक्षाविरोधी अजिबात नाही. माझे बंड शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळावे आणि ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली.

खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, अडीच वर्षांत भरपूर त्रास सहन केला. विद्यमान आमदारांचे काही ऐकायचेच नाही, असे ठरवल्यासारखे राजकारण खानापूर मतदार संघात सुरू होते. सत्तेत असलो, नसलो तरी टेंभू योजनेच्या मांडणीपासून आजअखेर गेले दोन ते अडीच तप तत्कालीन सत्तेशी संघर्ष केला. कधी नियोजनाचा अभाव, कधी अनुशेषामुळे निधी मिळण्यात अडचण, कधी तांत्रिक बाबींमुळे योजनेत करावे लागणारे बदल, यामुळे संघर्ष केला. २०१४ ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनीही, आपल्याला मंत्रीपद देऊ, असे मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळीच आपल्याला मंत्रीपदापेक्षा टेंभू योजनेची पूर्तता करणे, हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, असे स्पष्ट केले होते.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याबद्दल प्रयत्न केला. तो टप्पा मंजूर झाला. मात्र, मित्रपक्ष असणाऱ्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याच्या मंजुरीचे फलक लावून, फटाके वाजवून, पेढे वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेणार, यापुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, असाही प्रचार त्या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांकडून जाहीरपणे सुरू होता. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. पण त्यांची म्हणावीशी दखल घेतली गेली नाही, असे बाबर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ