शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार?

By अविनाश कोळी | Updated: February 19, 2024 19:23 IST

नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले

अविनाश कोळीसांगली : पात्रातून बाहेर पडत कृष्णा नदी महापुराचे रुप धारण करुन नागरी वस्त्यांमध्ये शिरते. जेव्हा ती शांत असते तेव्हा सांडपाण्यातून तिच्या उदरात टाकलेले विष ती नागरिकांनाच परत करीत असते. महापूर दरवर्षी येत नसला तरी वर्षानुवर्षाचा अन् दररोजचा विषप्रयोग सुरुच आहे. भगवान शंकराने समुद्रमंथनातील हालाहल पचविले, पण कृष्णेचे हे हलाहल सामान्यांना पचणारे नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांना विकारग्रस्त बनविणारे ठरणार आहे. महापूर रोखण्यासाठी जागतिक बँक धावली, पण प्रदूषणाचा फास सोडविण्यासाठी एकही यंत्रणा नाही राबली, ही शोकांतिका आहे.

खळाळत वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याचा मधूर आवाज, जलचरांचा मूक्तविहार असा निसर्गाचा रम्य नजारा आता केव्हाचाच नाहीसा झालाय. कधी काळवंडलेले दुर्गंधीयुक्त पाणी खळाळत वाहताना तर कधी मृत माशांचा खच पाहताना नदीकाठ आता भकास व उदासवाणा वाटतोय. आहे या परिस्थितीत रम्यपणाचा अनुभव घेणाऱ्या सकारात्मक मानसिकतेचे प्रशासन याला अपवाद आहे.नदीच्या पात्रात बांधकामांच्या माध्यमातून झालेले अतिक्रमण व नदीच्या पाण्यात सोडले जाणारे सांडपाणी, कारखान्यांचे केमिकल कृष्णा नदी साभार परत करीत आहे. कृष्णा नदीला कोयना धरणाचा आधार असल्याने किमान पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न नदीकाठच्या गावांत किंवा सांगली शहरांना सतावला नाही. गैरनियोजनामुळे पात्र कोरडे पडले तर नागरिकांच्या तोंडचे पाणी पळते. मात्र, या पाण्यातून आता मिनरलऐवजी प्रदूषणाचा डोस दिला जातोय. कृष्णा नदीने काठच्या गावांना समृद्धीचे वरदान दिले मात्र, नागरिकांनी तिला सांडपाण्यातून घाण केले.पाण्याचा गोंधळ न संपणारा

कृष्णेचे पाणी प्रदूषित झाल्यानंतर वारणा किंवा चांदोली धरणाचा पर्याय समोर आला आहे. यातून स्वच्छ पाणीपुरवठा होईलही, मात्र ज्या कृष्णेने सांगलीकरांची इतकी वर्षे तहान भागविली, समृद्धी दिली, जलचरांना जपले त्या कृष्णेला प्रदूषणाच्या विळख्यात सोडून पाठ फिरवणे ही माणुसकी नाही. आजाराने ग्रस्त आईला सोडून अन्य घरांमध्ये ममत्त्वाचा शोध घेणे उचित ठरेल का, असाही प्रश्न आहे.काठ सजला, नदी मेलीगेल्या कित्येक वर्षात सांगली, हरीपूर व जिल्ह्याच्या अन्य भागात नदीचा काठ स्थापत्यकलेने सजविण्यात आला. विद्युत रोषणाईने पूल उजळविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले, याच्या वेदना कोणाला होताना दिसत नाही. नदीचे देवत्त्व कोणाला का दिसत नाही, हा सवालही अस्वस्थ करतो.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण