शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार?

By अविनाश कोळी | Updated: February 19, 2024 19:23 IST

नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले

अविनाश कोळीसांगली : पात्रातून बाहेर पडत कृष्णा नदी महापुराचे रुप धारण करुन नागरी वस्त्यांमध्ये शिरते. जेव्हा ती शांत असते तेव्हा सांडपाण्यातून तिच्या उदरात टाकलेले विष ती नागरिकांनाच परत करीत असते. महापूर दरवर्षी येत नसला तरी वर्षानुवर्षाचा अन् दररोजचा विषप्रयोग सुरुच आहे. भगवान शंकराने समुद्रमंथनातील हालाहल पचविले, पण कृष्णेचे हे हलाहल सामान्यांना पचणारे नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांना विकारग्रस्त बनविणारे ठरणार आहे. महापूर रोखण्यासाठी जागतिक बँक धावली, पण प्रदूषणाचा फास सोडविण्यासाठी एकही यंत्रणा नाही राबली, ही शोकांतिका आहे.

खळाळत वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याचा मधूर आवाज, जलचरांचा मूक्तविहार असा निसर्गाचा रम्य नजारा आता केव्हाचाच नाहीसा झालाय. कधी काळवंडलेले दुर्गंधीयुक्त पाणी खळाळत वाहताना तर कधी मृत माशांचा खच पाहताना नदीकाठ आता भकास व उदासवाणा वाटतोय. आहे या परिस्थितीत रम्यपणाचा अनुभव घेणाऱ्या सकारात्मक मानसिकतेचे प्रशासन याला अपवाद आहे.नदीच्या पात्रात बांधकामांच्या माध्यमातून झालेले अतिक्रमण व नदीच्या पाण्यात सोडले जाणारे सांडपाणी, कारखान्यांचे केमिकल कृष्णा नदी साभार परत करीत आहे. कृष्णा नदीला कोयना धरणाचा आधार असल्याने किमान पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न नदीकाठच्या गावांत किंवा सांगली शहरांना सतावला नाही. गैरनियोजनामुळे पात्र कोरडे पडले तर नागरिकांच्या तोंडचे पाणी पळते. मात्र, या पाण्यातून आता मिनरलऐवजी प्रदूषणाचा डोस दिला जातोय. कृष्णा नदीने काठच्या गावांना समृद्धीचे वरदान दिले मात्र, नागरिकांनी तिला सांडपाण्यातून घाण केले.पाण्याचा गोंधळ न संपणारा

कृष्णेचे पाणी प्रदूषित झाल्यानंतर वारणा किंवा चांदोली धरणाचा पर्याय समोर आला आहे. यातून स्वच्छ पाणीपुरवठा होईलही, मात्र ज्या कृष्णेने सांगलीकरांची इतकी वर्षे तहान भागविली, समृद्धी दिली, जलचरांना जपले त्या कृष्णेला प्रदूषणाच्या विळख्यात सोडून पाठ फिरवणे ही माणुसकी नाही. आजाराने ग्रस्त आईला सोडून अन्य घरांमध्ये ममत्त्वाचा शोध घेणे उचित ठरेल का, असाही प्रश्न आहे.काठ सजला, नदी मेलीगेल्या कित्येक वर्षात सांगली, हरीपूर व जिल्ह्याच्या अन्य भागात नदीचा काठ स्थापत्यकलेने सजविण्यात आला. विद्युत रोषणाईने पूल उजळविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले, याच्या वेदना कोणाला होताना दिसत नाही. नदीचे देवत्त्व कोणाला का दिसत नाही, हा सवालही अस्वस्थ करतो.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण