शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

संविधान कोणीही बदलू शकणार नाही - अमित शाह; सांगली, शिराळा, कऱ्हाडमध्ये प्रचार सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:16 IST

'महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला'

सांगली : आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील. कोणीही माईचा लाल आला, तरी संविधान बदलणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांच्या सांगली, शिराळा, कऱ्हाड येथे सभा झाल्या.सांगली येथील सभेत शाह म्हणाले, संविधान हा प्रचाराचा मुद्दा नसून विश्वासाचा आहे. विरोधक संविधानाच्या नावावर मते मागतात, कारस्थाने रचतात. महाराष्ट्रातील एका सभेत संविधानाच्या कोऱ्याच प्रती वाटल्या. राहुल गांधी यांनी संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. संविधानाला हातात घेऊन संसदेत शपथ घेतली, ते तरी असली होते की नकली? हे त्यांनी देशाला सांगावे. नकली संविधान दाखविणाऱ्यांवर भरवसा कसा करायचा? नुकतेच ते इंग्लंडला गेले होते, तेव्हा देशाला आरक्षणाची गरज नसल्याचे म्हणाले. पण संविधानाला हात लावण्याची कोणाचीच हिम्मत नाही. आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील.

शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला देण्याचा डावशिराळा: वोट बँका जपण्यासाठी वक्फ बोर्डाला पाठबळ देण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. आघाडीचे सरकार चुकून जरी राज्यात आले, तर शेतकऱ्यांच्या जमिनी या बोर्डाला देण्याचे काम ते करतील, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथे केली.

चार पिढ्या आल्या, तरी कलम पुन्हा लागू हाेणार नाहीजम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर काँग्रेस व आघाडीतील नेत्यांचा विरोध झाला. हे कलम पुन्हा आणण्याचा त्यांचा विचार आहे. शरद पवारही त्यामध्ये आहेत. पण, शरद पवारांच्या अजून चार पिढ्या जरी आल्या, तरी आम्ही हे कलम पुन्हा लागू देणार नाही, असे शाह म्हणाले.

महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला !कऱ्हाड : ‘माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर नेहमी अन्याय केला असून ते या वयातही खोटे बोलतात,’ अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कऱ्हाड येथे केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेतशाह म्हणाले की, मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणायचे आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असल्याने राज्यातही युतीचे सरकार आले तर महाराष्ट्र देशातील क्रमांक एक राज्य बनेल. यासाठी महायुतीला व देवेंद्र यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शाह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. स्थानिक उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना त्यांनी राज्यासाठी फडणवीस यांना साथ देण्याचे आवाहन केल्यामुळे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत शाह यांनी दिल्याचा अंदाज बांधला जात आहे.

समर्थ रामदास यांचा शिवरायांना पाठिंबाअमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या शिराळ्याच्या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले. त्या समर्थ रामदास यांना मी नमन करतो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीshirala-acशिराळाkarad-north-acकराड उत्तरAmit Shahअमित शाहMahayutiमहायुती