शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

संविधान कोणीही बदलू शकणार नाही - अमित शाह; सांगली, शिराळा, कऱ्हाडमध्ये प्रचार सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:16 IST

'महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला'

सांगली : आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील. कोणीही माईचा लाल आला, तरी संविधान बदलणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांच्या सांगली, शिराळा, कऱ्हाड येथे सभा झाल्या.सांगली येथील सभेत शाह म्हणाले, संविधान हा प्रचाराचा मुद्दा नसून विश्वासाचा आहे. विरोधक संविधानाच्या नावावर मते मागतात, कारस्थाने रचतात. महाराष्ट्रातील एका सभेत संविधानाच्या कोऱ्याच प्रती वाटल्या. राहुल गांधी यांनी संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. संविधानाला हातात घेऊन संसदेत शपथ घेतली, ते तरी असली होते की नकली? हे त्यांनी देशाला सांगावे. नकली संविधान दाखविणाऱ्यांवर भरवसा कसा करायचा? नुकतेच ते इंग्लंडला गेले होते, तेव्हा देशाला आरक्षणाची गरज नसल्याचे म्हणाले. पण संविधानाला हात लावण्याची कोणाचीच हिम्मत नाही. आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील.

शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला देण्याचा डावशिराळा: वोट बँका जपण्यासाठी वक्फ बोर्डाला पाठबळ देण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. आघाडीचे सरकार चुकून जरी राज्यात आले, तर शेतकऱ्यांच्या जमिनी या बोर्डाला देण्याचे काम ते करतील, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथे केली.

चार पिढ्या आल्या, तरी कलम पुन्हा लागू हाेणार नाहीजम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर काँग्रेस व आघाडीतील नेत्यांचा विरोध झाला. हे कलम पुन्हा आणण्याचा त्यांचा विचार आहे. शरद पवारही त्यामध्ये आहेत. पण, शरद पवारांच्या अजून चार पिढ्या जरी आल्या, तरी आम्ही हे कलम पुन्हा लागू देणार नाही, असे शाह म्हणाले.

महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला !कऱ्हाड : ‘माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर नेहमी अन्याय केला असून ते या वयातही खोटे बोलतात,’ अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कऱ्हाड येथे केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेतशाह म्हणाले की, मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणायचे आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असल्याने राज्यातही युतीचे सरकार आले तर महाराष्ट्र देशातील क्रमांक एक राज्य बनेल. यासाठी महायुतीला व देवेंद्र यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शाह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. स्थानिक उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना त्यांनी राज्यासाठी फडणवीस यांना साथ देण्याचे आवाहन केल्यामुळे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत शाह यांनी दिल्याचा अंदाज बांधला जात आहे.

समर्थ रामदास यांचा शिवरायांना पाठिंबाअमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या शिराळ्याच्या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले. त्या समर्थ रामदास यांना मी नमन करतो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीshirala-acशिराळाkarad-north-acकराड उत्तरAmit Shahअमित शाहMahayutiमहायुती