शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपघातानंतर सहा तास मिळाली नाही मदत; कारमध्ये रक्ताचं थारोळं, सहा जणांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:28 IST

तासगावजवळ मंगळवारी मध्यरात्री चालक आजोबांचा ताबा सुटून कार कालव्यात काेसळली

लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव: काेकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीचा वाढदिवस साजरा करून दाेन मुली- नातवंडांना घेऊन तासगावला परतत असताना अपघातात आजी- आजाेबांसह ६ जणांचा मृत्यू झाला. एकाच अपघाताने तीन कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तासगाव-मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत मंगळवारी मध्यरात्री चालक असलेल्या आजोबांचा ताबा सुटून कार कालव्यात काेसळली. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.

अपघातात राजेंद्र पाटील (५६), सुजाता राजेंद्र पाटील (५२, दाेघेही रा. तासगाव), त्यांची मुलगी प्रियांका खराडे (३३), नात दूर्वा खराडे (५), कार्तिकी खराडे (१, सर्व मूळ रा. बुधगाव, ता. मिरज, सध्या रा. पुणे) आणि राजवी भोसले (३, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले (३०, रा. कोकळे) ही गंभीर जखमी झाली आहे.

तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे मंगळवारी कुटुंबीयांसमवेत कारमधून कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे आपली लहान मुलगी स्वप्नालीच्या घरी, नात राजवीच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी सुजाता, पुण्याहून सुटीसाठी आलेली मोठी मुलगी प्रियांका आणि तिच्या दोन मुली दूर्वा आणि कार्तिकी हाेत्या. तेथून रात्री उशिरा परतताना हा अपघात झाला. 

कारमध्ये अक्षरश: रक्ताचा थारोळा

अपघात मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास झाला. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. तात्काळ तासगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये स्वप्नाली भोसले जखमी अवस्थेत आढळल्या. रात्रीची वेळ व फारशी वर्दळ नसल्याने अपघातानंतर सहा तासांपर्यंत अपघातग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. वेळेत मदत मिळाली असती, तर काही जीव वाचवता आले असते.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू