शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

निजामी मराठा विरुद्ध रयतेतला मराठा असेच आरक्षणाचे भांडण - प्रकाश आंबेडकर 

By अविनाश कोळी | Updated: November 29, 2023 18:01 IST

जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न

सांगली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने बौद्धिक प्रामाणिकपणा दाखविला नाही. दुसरीकडे आरक्षणाचे हे भांडण निजामी मराठे विरुद्ध रयतेतले मराठे अशा स्वरुपाचे आहे. निजामी मराठ्यांना रयतेतल्या मराठ्यांचा प्रश्न सोडवायचा नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या ७० वर्षाच्या कालखंडात दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा काळ वगळता निजामी मराठ्यांचीच सत्ता राहिली आहे. निजामी मराठ्यांनी रयतेतल्या मराठ्यांचा केवळ मतांसाठी वापर केला. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व स्तरावर त्यांचे नुकसान करण्याचे काम निजामी मराठ्यांनी केले. रयतेतल्या मराठ्यांचे प्रश्न त्यांना सोडवायचे नव्हते. त्यांचे प्रश्न अधिक गंभीर करण्यात सत्तेतले मराठेच कारणीभूत आहेत. रयतेतल्या मराठ्यांचे नेतृत्त्व सध्या मनोज जरांगे-पाटील करीत आहेत. आता त्यांच्याही लढ्याचे खच्चीकरण करण्याचे राजकारण सुरु आहे.

ते म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीत दोष नसून हा सरकारचाच दोष आहे. आरक्षणाचा प्रश्न कसा सुटू शकतो हे मी यापूर्वीच मुंबईत सांगितले होते. मराठा आरक्षणाचे ताट व ओबीसी आरक्षणाचे ताट वेगवेगळे आहे. ओबीसी समुदायाला त्यांचे ताट मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे जो बौद्धिक प्रामाणिकपणा हवा तोच दिसत नाही. याऊलट आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असे भांडण निर्माण केले जात आहे. धनगर समाजाचा प्रश्नही आता पुढे आला आहे. त्यातून धनगर विरुद्ध आदिवासी आणि कोळी समाज विरुद्ध आदिवासी अशी भांडणे लावली जात आहेत.इंडिया आघाडीकडे प्रस्ताव दिलाइंडिया आघाडीत आम्हाला सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे काँग्रेसकडे आम्ही तसा प्रस्ताव दिला आहे. जागावाटपाबाबत कोणताही विचार सध्या नाही. आघाडीत सहभागाचा निर्णय झाल्यानंतर जागांचा विचार करु, असे आंबेडकर म्हणाले.

थेट सरकारी भरती घटनाविरोधीभारतीय प्रशासकीय सेवेत जी थेट भरती केली गेली, ती संविधानविरोधी आहे. थेट भरतीची तरतुद असली तरी त्यापद्धतीने ती होत नाही. संरक्षण दलात सध्या तात्पुरत्या स्वरुपात जवानांची केली जाणारी भरतीही अयोग्य आहे. संरक्षण दल कमकुवत करण्याचा हा प्रकार थांबला पाहिजे, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sangliसांगलीreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर