शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

निजामी मराठा विरुद्ध रयतेतला मराठा असेच आरक्षणाचे भांडण - प्रकाश आंबेडकर 

By अविनाश कोळी | Updated: November 29, 2023 18:01 IST

जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न

सांगली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने बौद्धिक प्रामाणिकपणा दाखविला नाही. दुसरीकडे आरक्षणाचे हे भांडण निजामी मराठे विरुद्ध रयतेतले मराठे अशा स्वरुपाचे आहे. निजामी मराठ्यांना रयतेतल्या मराठ्यांचा प्रश्न सोडवायचा नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या ७० वर्षाच्या कालखंडात दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा काळ वगळता निजामी मराठ्यांचीच सत्ता राहिली आहे. निजामी मराठ्यांनी रयतेतल्या मराठ्यांचा केवळ मतांसाठी वापर केला. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व स्तरावर त्यांचे नुकसान करण्याचे काम निजामी मराठ्यांनी केले. रयतेतल्या मराठ्यांचे प्रश्न त्यांना सोडवायचे नव्हते. त्यांचे प्रश्न अधिक गंभीर करण्यात सत्तेतले मराठेच कारणीभूत आहेत. रयतेतल्या मराठ्यांचे नेतृत्त्व सध्या मनोज जरांगे-पाटील करीत आहेत. आता त्यांच्याही लढ्याचे खच्चीकरण करण्याचे राजकारण सुरु आहे.

ते म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीत दोष नसून हा सरकारचाच दोष आहे. आरक्षणाचा प्रश्न कसा सुटू शकतो हे मी यापूर्वीच मुंबईत सांगितले होते. मराठा आरक्षणाचे ताट व ओबीसी आरक्षणाचे ताट वेगवेगळे आहे. ओबीसी समुदायाला त्यांचे ताट मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे जो बौद्धिक प्रामाणिकपणा हवा तोच दिसत नाही. याऊलट आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असे भांडण निर्माण केले जात आहे. धनगर समाजाचा प्रश्नही आता पुढे आला आहे. त्यातून धनगर विरुद्ध आदिवासी आणि कोळी समाज विरुद्ध आदिवासी अशी भांडणे लावली जात आहेत.इंडिया आघाडीकडे प्रस्ताव दिलाइंडिया आघाडीत आम्हाला सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे काँग्रेसकडे आम्ही तसा प्रस्ताव दिला आहे. जागावाटपाबाबत कोणताही विचार सध्या नाही. आघाडीत सहभागाचा निर्णय झाल्यानंतर जागांचा विचार करु, असे आंबेडकर म्हणाले.

थेट सरकारी भरती घटनाविरोधीभारतीय प्रशासकीय सेवेत जी थेट भरती केली गेली, ती संविधानविरोधी आहे. थेट भरतीची तरतुद असली तरी त्यापद्धतीने ती होत नाही. संरक्षण दलात सध्या तात्पुरत्या स्वरुपात जवानांची केली जाणारी भरतीही अयोग्य आहे. संरक्षण दल कमकुवत करण्याचा हा प्रकार थांबला पाहिजे, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sangliसांगलीreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर