शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदींवर नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू अंकुश ठेवतील - ॲड. असीम सरोदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:17 IST

सांगलीत विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे व्याख्यान

सांगली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या निमित्ताने देशात अघोषित आणीबाणीचा तिसरा अध्याय सुरू होत आहे; पण नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू त्यांना नियंत्रित करतील, अशी अपेक्षा आहे. मोदी यांनी शपथ घेताना देशभरातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन ‘निर्भय बनो’ मोहिमेचे प्रणेेते ॲड. असीम सरोदे यांनी केले.सांगलीत रविवारी विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित ‘कायद्याच्या राज्याचे पैलू आणि संविधान’ या विषयावरील व्याख्यानावेळी ते बोलत होते. कष्टकरी नेते बापूसाहेब मगदूम, नामदेवराव करगणे व ॲड. के. डी. शिंदे यांना अभिवादनासाठी नगर वाचनालयाच्या सभागृहात ॲड. सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरोगामी नेते व्ही. वाय. पाटील होते.ॲड. सरोदे म्हणाले, लोकसभेच्या प्रचारात आमिषे दाखवली गेली. त्याबद्दल तक्रारीही झाल्या. मोदी, अमित शहा यांच्याविरोधातील तक्रारींची दखल घेतली गेली नाही; पण मतदारांनी ताकद दाखवत गुर्मी उतरवली. कायद्यापेक्षा तुम्ही मोठे नाही, हे दाखवून दिले.हद्दपारीची वाईट प्रक्रिया निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात वापरली. अनेक जिल्ह्यांत याद्या तयार करून विरोधकांना हद्दपार केले. हे योग्य नाही. पोलिस अशी कामे करतात, तेव्हा वाईट वाटते. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात शेतकरी मृत्युमुखी पडण्यास मोदीच जबाबदार आहेत. फक्त ५६ इंच छाती दाखवू नका, मनात किती दम आहे ते दाखवा. फक्त जातिधर्मांत भांडणे लावतात, म्हणूनच मोदी हे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाहीत. ते फार दिवस राहणारही नाहीत.सरोदे म्हणाले, राहुल गांधींना घरातून, संसदेतून बाहेर काढले; पण ते झगडून परत आले. ते झगडणाऱ्या माणसाचे प्रतीक आहेत. त्याच राहुलना विरोधी पक्षनेता म्हणून सन्मानाने संसदेत पहिल्या बाकावर बसविण्याची वेळ मोदींवर आली आहे. लोकांना पैसे वाटत मोदींनी देशाला भिकारी केले आहे. नव्या कायद्यात देशद्रोह कलम आणखी मजबूत केले आहे; पण हे काळे ब्रिटिश फार काळ चालणार नाहीत.यावेळी प्रा. बाबूराव गुरव, ॲड. अमित शिंदे, विकास मगदूम, अजितराव सूर्यवंशी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ॲड. सुभाष पाटील, संपतराव पवार, आदी उपस्थित होते.

..यासाठी कलम ३७० हटविलेसरोदे म्हणाले, काश्मीरमध्ये जगातील सातव्या क्रमांकाचा लिथियमचा साठा सापडला. तो बाहेर काढण्यासाठीच कलम ३७० हटविले. उद्योगपतींना तेथे जमिनी घेता याव्यात याची सोय केली. देशभक्तीच्या नावाखाली देशाची लूट करण्याचे उद्योग सुरू आहेत. मुस्लिमांविरोधात चित्रपट काढून भीती निर्माण केली जात आहे. अचानक हिंदू खतरे में सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटांचाही धोका लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्याकडे पाळीव भाडोत्री अभिनेते आहेत. द्वेषावर आधारित देशभक्ती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न लोकांनी निवडणुकीत हाणून पाडला.

भिडे यांना अटक का नाही?सरोदे म्हणाले, २०१४ ते २०२४ पर्यंत यंत्रणांचा गैरवापर झाला. विरोधी नेत्यांनाच पकडले गेले. अजित पवारांवर मोदींनी आरोप केले आणि दुसऱ्या दिवशी तेच उपमुख्यमंत्री झाले. २०१४ पासून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात १९० टक्के वाढ झाली. मग सांगलीत मनोहर भिडेंना का अटक केली नाही? १५ ऑगस्ट रोजी त्यांनी भगव्याची मिरवणूक का काढली? हेच एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर चालले असते का?

नायडू, नितीशकुमारांच्या अटीसरोदे म्हणाले, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी सरकारला पाठिंबा देताना घातलेल्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शहा गृहमंत्रिपदावर नकोत, मोदींनी दोन महिन्यांतून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, अशा अटी घातल्या आहेत. त्या मान्य होतात का, ते पाहावे लागेल.

सरोदे म्हणाले..- २०१७ ते २०१९ दरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश का नेमले नाहीत हे मोदी, शहांनी सांगावे.- संविधान मान्य असल्यास मनुस्मृती वाईट हे मोदींनी सांगावे. राजस्थान न्यायालयाच्या आवारातील मनूचा पुतळा हटवावा.- जरांगेंच्या भीतीने फडणवीसांनी मराठवाड्यात सभा घेतली नाही.- न्यायाधीशांच्या कामाचे मूल्यमापन व्हायला हवे.- इंदिरा गांधींनी आणीबाणीची चूक समजल्यावर माफी मागितली.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAsim Sarodeअसिम सराेदे