शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

मोदींवर नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू अंकुश ठेवतील - ॲड. असीम सरोदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:17 IST

सांगलीत विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे व्याख्यान

सांगली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या निमित्ताने देशात अघोषित आणीबाणीचा तिसरा अध्याय सुरू होत आहे; पण नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू त्यांना नियंत्रित करतील, अशी अपेक्षा आहे. मोदी यांनी शपथ घेताना देशभरातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन ‘निर्भय बनो’ मोहिमेचे प्रणेेते ॲड. असीम सरोदे यांनी केले.सांगलीत रविवारी विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित ‘कायद्याच्या राज्याचे पैलू आणि संविधान’ या विषयावरील व्याख्यानावेळी ते बोलत होते. कष्टकरी नेते बापूसाहेब मगदूम, नामदेवराव करगणे व ॲड. के. डी. शिंदे यांना अभिवादनासाठी नगर वाचनालयाच्या सभागृहात ॲड. सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरोगामी नेते व्ही. वाय. पाटील होते.ॲड. सरोदे म्हणाले, लोकसभेच्या प्रचारात आमिषे दाखवली गेली. त्याबद्दल तक्रारीही झाल्या. मोदी, अमित शहा यांच्याविरोधातील तक्रारींची दखल घेतली गेली नाही; पण मतदारांनी ताकद दाखवत गुर्मी उतरवली. कायद्यापेक्षा तुम्ही मोठे नाही, हे दाखवून दिले.हद्दपारीची वाईट प्रक्रिया निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात वापरली. अनेक जिल्ह्यांत याद्या तयार करून विरोधकांना हद्दपार केले. हे योग्य नाही. पोलिस अशी कामे करतात, तेव्हा वाईट वाटते. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात शेतकरी मृत्युमुखी पडण्यास मोदीच जबाबदार आहेत. फक्त ५६ इंच छाती दाखवू नका, मनात किती दम आहे ते दाखवा. फक्त जातिधर्मांत भांडणे लावतात, म्हणूनच मोदी हे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाहीत. ते फार दिवस राहणारही नाहीत.सरोदे म्हणाले, राहुल गांधींना घरातून, संसदेतून बाहेर काढले; पण ते झगडून परत आले. ते झगडणाऱ्या माणसाचे प्रतीक आहेत. त्याच राहुलना विरोधी पक्षनेता म्हणून सन्मानाने संसदेत पहिल्या बाकावर बसविण्याची वेळ मोदींवर आली आहे. लोकांना पैसे वाटत मोदींनी देशाला भिकारी केले आहे. नव्या कायद्यात देशद्रोह कलम आणखी मजबूत केले आहे; पण हे काळे ब्रिटिश फार काळ चालणार नाहीत.यावेळी प्रा. बाबूराव गुरव, ॲड. अमित शिंदे, विकास मगदूम, अजितराव सूर्यवंशी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ॲड. सुभाष पाटील, संपतराव पवार, आदी उपस्थित होते.

..यासाठी कलम ३७० हटविलेसरोदे म्हणाले, काश्मीरमध्ये जगातील सातव्या क्रमांकाचा लिथियमचा साठा सापडला. तो बाहेर काढण्यासाठीच कलम ३७० हटविले. उद्योगपतींना तेथे जमिनी घेता याव्यात याची सोय केली. देशभक्तीच्या नावाखाली देशाची लूट करण्याचे उद्योग सुरू आहेत. मुस्लिमांविरोधात चित्रपट काढून भीती निर्माण केली जात आहे. अचानक हिंदू खतरे में सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटांचाही धोका लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्याकडे पाळीव भाडोत्री अभिनेते आहेत. द्वेषावर आधारित देशभक्ती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न लोकांनी निवडणुकीत हाणून पाडला.

भिडे यांना अटक का नाही?सरोदे म्हणाले, २०१४ ते २०२४ पर्यंत यंत्रणांचा गैरवापर झाला. विरोधी नेत्यांनाच पकडले गेले. अजित पवारांवर मोदींनी आरोप केले आणि दुसऱ्या दिवशी तेच उपमुख्यमंत्री झाले. २०१४ पासून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात १९० टक्के वाढ झाली. मग सांगलीत मनोहर भिडेंना का अटक केली नाही? १५ ऑगस्ट रोजी त्यांनी भगव्याची मिरवणूक का काढली? हेच एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर चालले असते का?

नायडू, नितीशकुमारांच्या अटीसरोदे म्हणाले, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी सरकारला पाठिंबा देताना घातलेल्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शहा गृहमंत्रिपदावर नकोत, मोदींनी दोन महिन्यांतून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, अशा अटी घातल्या आहेत. त्या मान्य होतात का, ते पाहावे लागेल.

सरोदे म्हणाले..- २०१७ ते २०१९ दरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश का नेमले नाहीत हे मोदी, शहांनी सांगावे.- संविधान मान्य असल्यास मनुस्मृती वाईट हे मोदींनी सांगावे. राजस्थान न्यायालयाच्या आवारातील मनूचा पुतळा हटवावा.- जरांगेंच्या भीतीने फडणवीसांनी मराठवाड्यात सभा घेतली नाही.- न्यायाधीशांच्या कामाचे मूल्यमापन व्हायला हवे.- इंदिरा गांधींनी आणीबाणीची चूक समजल्यावर माफी मागितली.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAsim Sarodeअसिम सराेदे