शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Jayant Patil : "तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 17:43 IST

Jayant Patil : आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Jayant Patil On Rohit Patil ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये एका पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी रोहित पाटील यांचा विधानसभेला विजय निश्चित असल्याचे म्हणाले. यामुळे रोहित पाटील यांनी महाराष्ट्रातही फिरले पाहिजे, विरोधकांमध्ये आणि रोहित पाटील यांच्यात मोठा फरक असणार असंही जयंत पाटील म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील पाटील यांचा विजयाबाबत भाष्य केले. रोहित पाटील यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरण्याबाबतही भाष्य केले, यामुळे आता विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील राज्यात प्रचारासाठी दौरा काढणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आरआर पाटील आबा यांनीही पक्षासाठी याआधी प्रचारसभा घेतल्या होत्या. आबांच्या सभांना राज्यभरातून मोठी मागणी होती. रोहित पाटील यांचीही आरआर आबांसारखीख भाषण करण्याटची पद्धत आहे, त्यामुळे रोहित पाटील यांना निवडणूक काळात राज्यातून मोठी मागणी असल्याचे बोलले जात आहे. 

“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले,  आता राज्यात वातावरण बदलले आहे. रोहितदादांनी सांगितले की राष्ट्रवादीचा पहिला आमदार तासगाव मतदारसंघातून निवडून येणार आहे. आणि आलाच पाहिजे. डोळे झाकून तो निवडून येईल, तुम्ही आता महाराष्ट्रातही वेळ द्यायला हरकत नाही. कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे, तुम्ही त्याची काही चिंता करु नका. तुमची सीट मोजल्यात जमा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की, आपला पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात फिरले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले. 

"सुमन ताईंना अनेकांचा फोन आला"

"आपल्या पक्षातून बरीच लोक बाहेर गेली, काही लोक गेल्यानंतर सुमनताईंना किती फोन येत होते, किती दबाव होता मला माहित आहे. त्या दबावाला बळी पडल्या नाही, त्यांनी पवार साहेब जिथे असतील तिथे आम्ही असणार असं सांगितलं. ही एकनिष्ठता पाहिजे, असंही पाटील म्हणाले. 

"पूर्वी लोक म्हणायचे यांना उमेदवार मिळणार नाहीत. पण, आता वातावरण बदलले आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन,तीन उमेदवार उमेदवारी मागत आहेत. उद्याची विधानसभा होईल त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

'...आता अधिकारी बोलायला लागले'

"सरकारी अधिकारी आमच्यासोबत आधी बोलायचे नाहीत, आता बोलायला लागलेत.आमच्याशी म्हणजेच कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. कारण आता वारं बदलले आहे. वारं बदलले आहे हे सगळ्यात आधी सरकारी अधिकाऱ्यांना कळते, असंही पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलRohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024Supriya Suleसुप्रिया सुळे