शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

जलसंपदाच्या पाण्यावर जयंतरावांचं सिंचन, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांसाठी 'मार्केटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:14 IST

जिल्ह्यातल्या कोणत्याही निवडणुकीच्या हाका सर्वांत आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना ऐकू येतात.

श्रीनिवास नागे

जिल्ह्यातल्या कोणत्याही निवडणुकीच्या हाका सर्वांत आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना ऐकू येतात. येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका होताहेत, त्याही पुढच्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जयंतरावांना दिसू लागल्यात. त्यामुळेच जलसंपदासारख्या मलईदार खात्याच्या पाण्यावर त्यांनी जिल्हाभरात राष्ट्रवादीचं सिंचन सुरू केलंय. सत्तेतून बाहेर फेकलेला भाजप कानकोंडा झालाय, तर सत्तेतल्या काँग्रेस-शिवसेनेच्या हाती हे सगळं मुकाट बघत बसण्याशिवाय काही राहिलेलं नाही.पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद हातात. जिल्ह्यावर मांड ठोकायची, तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात हव्यातच. त्या जोरावर पक्षातला रुबाब वाढतो, तो वेगळाच. मुरब्बी जयंतराव हे जाणतात. त्यासाठी त्यांनी हातातल्या जलसंपदा विभागाचा पुरेपूर वापर केलाय. जिल्ह्याचं राजकारण पाण्यावर फिरत असल्यानं सिंचनाच्या कामांचा धडाका लावलाय. जिल्ह्यात ३८५८ कोटींची सिंचनाची कामं पाईपलाईनमध्ये असल्याचं त्यांनी सर्वांत आधी जाहीर केलंय. जलसंपदा आणि पालकमंत्री म्हणून हे जाहीर करण्याची केवढी ती घाईगडबड! या कामांचं श्रेय केवळ स्वत:ला! ज्या-ज्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघासाठी प्रस्ताव दिले, त्यांनीही बोलायचं नाही.बोललंच तर, जयंतरावांचे प्रयत्न ठासून सांगायचे. काय बिशाद आहे, याविरोधात जायची! शिवाय जिल्हाभरातली राष्ट्रवादीची टीम आहेच, ढोल बडवायला. सगळीकडं सुरू असलेले पाणीपूजन सोहळे वेगळेच. जिल्ह्यातलं एकही गाव कृष्णा-वारणेच्या पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, असं ठासून सांगायचं.

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर असताना या कामांचं मार्केटिंग झालं नसतं, तरच नवल! जिल्हा परिषदेतली सत्ता हातात नसल्याचं शल्य जयंतरावांना जाचतंय. या निवडणुकीच्या हाका ऐकू आल्यानंच त्यांनी परिवार संवाद यात्रा काढून राज्य ढवळून काढलं. अदमास घेतला. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातली शक्तिस्थळं आणि कमकुवत धागे त्यांनी टिपलेत. आघाडी झाली तर आणि नाही झाली तर काय करायचं, याची गणितं मांडलीत. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेला जाग येण्याआधीच ‘दे धक्का’ श्रेय लाटण्याचा!

भाजप कानकोंडा, तर काँग्रेस-शिवसेनेवर कुरघोडी

  • भाजपच्या दोनपैकी सांगलीच्या आमदारांच्या मतदारसंघात जलसिंचनाच्या कामांचा संबंध नाही, तर मिरजेच्या आमदारांना नक्की मतदारसंघातले प्रश्नच माहीत नाहीत. राष्ट्रवादीचे शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार सोबतच असतात. पण पलूस-कडेगाव आणि जत इथं काँग्रेसला, तर खानापूर-आटपाडीत शिवसेनेला बोलण्याची फुरसतही जयंतराव देत नाहीत.
  • जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटकातल्या तुबची-बबलेश्वर योजनेतून कमी खर्चात पूर्व भागात पाणी आणण्याचा प्रस्ताव मांडला होता, तो कधीच गुंडाळला गेलाय. उलट तिथल्या ६४ गावांसाठी सातशे कोटी खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं काम जयंतरावांनी रेटलंय. आता खानापूर-आटपाडीत टेंभू योजनेसाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या अनिल बाबरांवर कुरघोडीसाठी राष्ट्रवादी उठून बसलीय. जोरात चाललंय राष्ट्रवादीचं सिंचन.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक