शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीला पुन्हा बळ-जयंत पाटील यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:24 IST

आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि इस्लामपूर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीला ऊर्जा मिळाली. इस्लामपूर पालिकेनंतर जिल्हा परिषद, सांगली महापालिकेत राष्ट्रवादीला बसलेला झटका

ठळक मुद्देदुसऱ्या फळीतील शिलेदारांना मिळतेय संधी, भाजपचे कमळ खुडण्याचा डाव

अशोक पाटील ।इस्लामपूर : आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि इस्लामपूर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीला ऊर्जा मिळाली. इस्लामपूर पालिकेनंतर जिल्हा परिषद, सांगली महापालिकेत राष्ट्रवादीला बसलेला झटका आमदार पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे राज्यात दौरा करून कार्यकारिणीत बदल केले. स्वत:च्या घरातच फुलत असलेले भाजपचे कमळ खुडण्याचा डाव राष्ट्रवादीने आखला आहे.

इस्लामपूर मतदारसंघात आष्टा, वाळवा आणि परिसरातील गावे महत्त्वाची मानली जातात. माजी आमदार विलासराव शिंदे यांचा गट येथे कार्यरत आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी या गटाला जपले आहे. मात्र वैभव शिंदे यांच्यारूपाने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या परिसरात पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावर उपाय म्हणून आ. पाटील यांनी विलासराव शिंदे यांचे जिल्हाध्यक्षपद कायम ठेवले आहे.

अशीच परिस्थिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या गटात आहे. डांगे यांची ताकद पाहता, आमदार पाटील यांनी अ‍ॅड. चिमण डांगे यांच्यावर राज्याच्या चिटणीसपदाची जबाबदारी देऊन धनगर समाजातील युवा संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

हुतात्मा संकुलाची वेगळी ताकद नेहमीच आमदार पाटील यांच्याविरोधात गेली आहे. तिला थोपविण्यासाठी राजारामबापू पाटील यांच्याशी एकनिष्ठ असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांना अनेक पदांवर आ. पाटील यांनी संधी दिली आहे. आताही राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे पुत्र संग्राम यांच्यावर वाळवा तालुका राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, खोत आणि वैभव शिंदे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्नही चालवला आहे.त्यांच्याच मतदार संघात फुलत असलेले भाजपचे कमळ खुडून टाकण्यासाठी आ. पाटील यांची ही खेळी आहे. 

प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर राज्यातील काही भागात दौरा केला. तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विविध समाजातील घटकांना न्याय देऊन, जिल्हाध्यक्षापासून कार्यकारिणीत बदल केले आहेत. राज्य कार्यकारिणी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. राज्यात अठरा हजार कार्यकर्त्यांच्या बुथ कमिट्या तयार करून त्या नोंदणीकृत केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष प्रथम क्रमांकावर येईल.- आ. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस