शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दच्या मागणीसाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखला, सरकारविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:16 IST

मोठा पोलिस बंदोबस्त

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित सांगली जिल्ह्यातील १९ गावांमधील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता नागपूर-रत्नागिरी महामार्ग अंकली (ता. मिरज) येथे अर्धा तास रोखला. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत सुरू केली. सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच महामार्ग रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला.आंदोलनामध्ये किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उद्धवसेनेचे शंभूराज काटकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटिल, धनाजी पाटील, विराज बुटाला, गिरीश पवार, प्रकाश पाटील, के. डी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्ग बाधित १९ गावांमधील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नागपूर-गोवा हा प्रस्तावित ८०२ किमीचा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये २७ हजार ५०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहेत. या महामार्गात पिकाऊ जमीन जाणार असल्याने याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे लोन उसळले आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली नाही तर राज्यभर शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार आहेत, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

आता आमदारांच्या दारात आंदोलन : उमेश देशमुखशक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी विद्यमान सरकारमध्ये सहभागी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला.झोपेचे सोंग घेतलेल्यांना शेतकऱ्यांचा विरोध कधी दिसणार? : सतीश साखळकरशक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. परंतु सरकारला शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. दिसणार नाहीच, कारण झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे. अशा सरकारला वठणीवर आणायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करावेच लागणार आहे, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन