शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दच्या मागणीसाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखला, सरकारविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:16 IST

मोठा पोलिस बंदोबस्त

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित सांगली जिल्ह्यातील १९ गावांमधील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता नागपूर-रत्नागिरी महामार्ग अंकली (ता. मिरज) येथे अर्धा तास रोखला. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत सुरू केली. सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच महामार्ग रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला.आंदोलनामध्ये किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उद्धवसेनेचे शंभूराज काटकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटिल, धनाजी पाटील, विराज बुटाला, गिरीश पवार, प्रकाश पाटील, के. डी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्ग बाधित १९ गावांमधील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नागपूर-गोवा हा प्रस्तावित ८०२ किमीचा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये २७ हजार ५०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहेत. या महामार्गात पिकाऊ जमीन जाणार असल्याने याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे लोन उसळले आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली नाही तर राज्यभर शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार आहेत, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

आता आमदारांच्या दारात आंदोलन : उमेश देशमुखशक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी विद्यमान सरकारमध्ये सहभागी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला.झोपेचे सोंग घेतलेल्यांना शेतकऱ्यांचा विरोध कधी दिसणार? : सतीश साखळकरशक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. परंतु सरकारला शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. दिसणार नाहीच, कारण झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे. अशा सरकारला वठणीवर आणायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करावेच लागणार आहे, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन