शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दच्या मागणीसाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखला, सरकारविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:16 IST

मोठा पोलिस बंदोबस्त

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित सांगली जिल्ह्यातील १९ गावांमधील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता नागपूर-रत्नागिरी महामार्ग अंकली (ता. मिरज) येथे अर्धा तास रोखला. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत सुरू केली. सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच महामार्ग रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला.आंदोलनामध्ये किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उद्धवसेनेचे शंभूराज काटकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटिल, धनाजी पाटील, विराज बुटाला, गिरीश पवार, प्रकाश पाटील, के. डी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्ग बाधित १९ गावांमधील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नागपूर-गोवा हा प्रस्तावित ८०२ किमीचा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये २७ हजार ५०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहेत. या महामार्गात पिकाऊ जमीन जाणार असल्याने याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे लोन उसळले आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली नाही तर राज्यभर शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार आहेत, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

आता आमदारांच्या दारात आंदोलन : उमेश देशमुखशक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी विद्यमान सरकारमध्ये सहभागी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला.झोपेचे सोंग घेतलेल्यांना शेतकऱ्यांचा विरोध कधी दिसणार? : सतीश साखळकरशक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. परंतु सरकारला शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. दिसणार नाहीच, कारण झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे. अशा सरकारला वठणीवर आणायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करावेच लागणार आहे, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन