शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केलेः मोहन प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 8:09 PM

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आहे.

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आहे.ते सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. पतंगराव कदम, नसीम खान, हर्षवर्धन पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहन प्रकाशभाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. गेल्या तीन वर्षापासून शेतमालाला हमीभाव नाही. महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. यवतमाळमध्ये 25 शेतक-यांचा फवारणी करताना मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर नाचत असून,मोदी आणि जेटलींनी देश विकण्याचे काम सुरु केले आहे, असा घणाघाती आरोप मोहन प्रकाश यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी इंग्रजांची दलाली केली, ते सत्तेत बसून आज आम्हाला देशभक्ती शिकवू पाहत आहेत. काळा पैसा आणू म्हणणाऱ्या आणि १५ लाख रुपये बँक खात्यावर जमा करणा-यांनी किमान १५ हजार रुपयांची तरी मनीऑर्डर करायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला. भुपिंदरसिंग हुडाभाजपचे सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. युपीए सरकारच्या काळात समाधानी असणारा शेतकरी आज दुःखात आहे. शेतक-यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. धानाला भाव नाही मात्र तांदळाचे भाव वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 50 टक्क्याने कमी झाले आहेत देशात मात्र इंधनाचे दर वाढतच आहेत. तेलाचे दर वाढवून सरकारने 3 लाख कोटी रूपये कमावले आहेत. मोदी सरकार गरिबविरोधी आहे. निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते पण सत्तेवर येताच शिफारशी लागू करणे अशक्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले. युपीए सरकारच्या काळात हमीभावात दरवर्षी सरासरी 15 टक्के वाढ केली जायची या सरकारच्या काळात 4 टक्के ही वाढ नाही. नोटाबंदीमुळे देशातील उद्योगांना बसला असून उत्पादन घटले चीनमधून होणारी आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीचा खरा फायदा चीनलाच झाला आहे. देशभरात सरकारविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण असून जनआक्रोश मेळाव्याला जमलेला हा जसमुदाय परिवर्तनाचा संकेत आहे असे हुडा म्हणाले. अशोकराव चव्हाणराज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकार कसे चालवतात हे भाजपच्या लोकांना कळत नाही. या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. फसव्या घोषणा करणे आणि खोट्या जाहिराती देणे एवढेच काम या सरकारने केले आहे. राज्यातील शेतक-यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देऊ.