शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

..मग शरद पवार ४० वर्षे झाडू मारत होते का?, गोपीचंद पडळकरांनी केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:59 IST

मराठ्यांची फसवणूक कशासाठी?

ढालगाव : ‘मला महाराष्ट्राची सत्ता द्या, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकतो’, असे शरद पवार म्हणतात, मग गेली ४० वर्षे ते लोटत बसले होते काय? असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. गुरुवारी (आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) येथे बिरोबा बनातील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.पडळकर म्हणाले, प्रस्थापितांना गाडण्यासाठी आपण अठरापगड जातींनी आवश्यक ते सर्व केले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी त्यागाचीही तयारी ठेवायला हवी. आरेवाडीच्या बिरोबाची माती जो कपाळाला लावेल, तो कोणालाही भिडू शकतो, एवढी क्षमता या मातीत आहे. धनगड व धनगर यातील फरक संपला असून, त्याबाबतचे शुद्धिपत्रक आजच काढले आहे. धनगर समाजाची मागणी मान्य करून शासनाने दसरा उत्सव साजरा करण्याची संधी आम्हा धनगर बांधवांना द्यावी. हा दसरा मेळावा भविष्यात असाच वाढत राहिला, तर आरेवाडी हे राजकारणाचे केंद्र बनेल.प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उल्हास धायगुडे, समाधान कोळेकर, दादा लवटे, दौलत शितोळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, पोलिसपाटील रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

मराठ्यांची फसवणूक कशासाठी?गरीब मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले तर सर्व प्रश्न सुटतील, असा समज करून मराठ्यांची फसवणूक का करता? मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे का लावता? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Sangliसांगलीreservationआरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवार