शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

..मग शरद पवार ४० वर्षे झाडू मारत होते का?, गोपीचंद पडळकरांनी केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:59 IST

मराठ्यांची फसवणूक कशासाठी?

ढालगाव : ‘मला महाराष्ट्राची सत्ता द्या, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकतो’, असे शरद पवार म्हणतात, मग गेली ४० वर्षे ते लोटत बसले होते काय? असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. गुरुवारी (आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) येथे बिरोबा बनातील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.पडळकर म्हणाले, प्रस्थापितांना गाडण्यासाठी आपण अठरापगड जातींनी आवश्यक ते सर्व केले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी त्यागाचीही तयारी ठेवायला हवी. आरेवाडीच्या बिरोबाची माती जो कपाळाला लावेल, तो कोणालाही भिडू शकतो, एवढी क्षमता या मातीत आहे. धनगड व धनगर यातील फरक संपला असून, त्याबाबतचे शुद्धिपत्रक आजच काढले आहे. धनगर समाजाची मागणी मान्य करून शासनाने दसरा उत्सव साजरा करण्याची संधी आम्हा धनगर बांधवांना द्यावी. हा दसरा मेळावा भविष्यात असाच वाढत राहिला, तर आरेवाडी हे राजकारणाचे केंद्र बनेल.प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उल्हास धायगुडे, समाधान कोळेकर, दादा लवटे, दौलत शितोळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, पोलिसपाटील रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

मराठ्यांची फसवणूक कशासाठी?गरीब मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले तर सर्व प्रश्न सुटतील, असा समज करून मराठ्यांची फसवणूक का करता? मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे का लावता? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Sangliसांगलीreservationआरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवार