शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

लातूरकरांचीही तहान भागविणारी मिरजेची हैदरखान विहीर बनली डबके, ऐतिहासिक वास्तू होणार नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:38 IST

२०१६ मध्ये मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत हैदरखान विहिरीत कृष्णा नदीच्या पाण्याचा साठा करून मिरजेतून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला

सदानंद औंधेमिरज : मिरजेतील रेल्वेस्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीतून सात वर्षांपूर्वी  दुष्काळात लातूरकरांचीही तहान भागविण्यात आली होती. मात्र, आता विहिरीचा वापर नसल्याने विहिरीचे डबके झाले आहे. या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी होत आहे. मिरज रेल्वेस्थानकात असलेल्या हैदरखान विहिरीचा ताबा १८८७ मध्ये  रेल्वेकडे आला. त्यानंतर सुमारे सव्वाशे वर्षे रेल्वेचे डबे धुणे, स्थानकाची स्वच्छता व रेल्वे गाड्यात पाणी भरण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर होत होता. रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने दहा वर्षांपूर्वी रेल्वेने मिरज स्थानक व कर्मचारी वसाहतीसाठी कृष्णा नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना  सुरू केली. त्यानंतर या विहिरीचे महत्त्व कमी झाले. २०१६ मध्ये मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत हैदरखान विहिरीत कृष्णा नदीच्या पाण्याचा साठा करून मिरजेतून  रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला. जलपरी एक्स्प्रेसने सलग चार महिने दररोज लाखो लिटर पाणी नेऊन लातूरकरांची तहान भागवली होती.  रेल्वेने पाणीपुरवठ्याच्या राज्यातील पहिल्याच यशस्वी प्रयोगामुळे हैदरखान विहिरीला मोठी प्रसिद्धी मिळाली. लातूरची तहान भागवणारी ही विहीर आता वापरात नाही. विहिरीत परिसरातील लोक कचरा टाकत आहेत. काठावरील  झाडांची पाने पाण्यात पडत आहेत. विहिरीत शेवाळ साचले आहे. विहिरीच्या कठड्यावर झुडपे उगवल्याने कठडे पडण्याच्या स्थितीत आहेत. रेल्वेने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू केल्याने हैदरखान विहिरीतील मुबलक पाण्याचा वापर थांबल्याने विहिरीचे डबके झाले आहे. लातूरला पाणीपुरवठ्यासाठी विहिरीत बसविण्यात आलेल्या मोटारी व जलवाहिन्या काढण्यात आल्या आहेत. या विहिरीची स्वच्छता, देखभालीकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहे. विहिरीचे पुनरुज्जीवन न झाल्यास ती इतिहासजमा होणार आहे.

आदिलशहाच्या सरदाराने बांधली विहीरविहिरीला ऐतिहासिक वारसा आहे. १५८३ मध्ये आदिलशहाचा सरदार हैदरखान याने बांधलेल्या या मोठ्या विहिरीतून त्याकाळी परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत होता. संस्थान काळातही सिंचनासाठी वापर होत असल्याची नोंद आहे. तिचे पाणी मिरज शहरात मीरासाहेब दर्ग्यात दगडी कारंजासाठी नेण्यात आले होते.  त्यासाठी हत्तींची मोट वापरण्यात येत होती. या विहिरीत हत्ती बांधण्यासाठी तयार केलेले दगडी अंकुश आजही सुस्थितीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजlaturलातूरWaterपाणी